28 C
Mumbai
Tuesday, March 25, 2025
घरविशेषदिल्लीत जाऊन आदित्य ठाकरेंची ईव्हीएम, निवडणूक आयोगावर शंका!

दिल्लीत जाऊन आदित्य ठाकरेंची ईव्हीएम, निवडणूक आयोगावर शंका!

अरविंद केजरीवालांची घेतली भेट

Google News Follow

Related

उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी आज (१३ फेब्रुवारी) आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. बैठकीनंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना निवडणूक आयोग आणि भाजप यांच्यात संगनमताचे अनेक आरोप केले. तथापि, आदित्य ठाकरे यांनी केलेले आरोप यापूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही केले आहेत, ज्यावर निवडणूक आयोगाने वेळोवेळी स्पष्टीकरण दिले आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या भेटीबद्दल आदित्य ठाकरे म्हणाले, आज मी अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. सरकार येईल जाईल, पुन्हा येईल पण संबंध चालू राहिले पाहिजेत आम्ही हेच सांगण्यासाठी येथे आलो होतो. ते पुढे म्हणाले, गेल्या दहा वर्षांत त्यांनी (अरविंद केजरीवाल) दिल्लीत केलेल्या कामाबद्दल संपूर्ण जनता जाणते.

निवडणूक आयोगावर आरोप करताना आदित्य ठाकरे म्हणाले, या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाची मोठी भूमिका होती, हा त्यांचा आशीर्वाद होता आणि भाजपने निवडणूक आयोगाचे आभार मानणे महत्त्वाचे आहे, परंतु जसे मी राहुल गांधी यांच्याशी बोललो, तसेच आज मी अरविंद केजरीवाल यांच्याशी बोललो, मग ते इंडिया अलायन्स असो किंवा सर्व पक्ष असो. पुढच्या पावलांसाठी कुठेतरी विचार करावा लागेल. कारण आपली लोकशाही मुक्त आणि निष्पक्ष राहिलेली नाही, निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष झालेल्या नाहीत, ते पुढे म्हणाले.

हे ही वाचा : 

शहरी नागरिकांसाठी आता प्रधानमंत्री आवास योजना २.० ची अंमलबजावणी

बांगलादेशात हिंदू अल्पवयीन मुलीचे अपहरण, ९ दिवस उलटूनही तपास नाही!

काही लोकांनी लपून-छपून महाकुंभात स्नान केले आणि जनतेला सांगतात जाऊ नका!

लालूप्रसाद यादव म्हणतात, जब तक बिहार मे है लालू…

ते पुढे म्हणाले, अनेक ठिकाणी मते कापली गेली, मते वगळण्यात आली. याचाही कधी ना कधी विचार करणे आवश्यक आहे कारण लोकांकडून मतदानाचा अधिकार हिरावून घेतला गेला आहे, तो निवडणूक आयोगाने हिरावून घेतला आहे, त्यामुळे त्याबद्दलही चर्चा करणे आवश्यक आहे.

‘…महाराष्ट्रात ४७ लाख मतदार कसे वाढले?, मतदानाच्या शेवटी ७६ लाख मतदान कोठून आले, ते कोणी केले?, याचे काही व्हिडिओ फुटेज आहे का, तुमच्याकडे टोकन आहेत का? निवडणूक आयोग याबद्दल बोलण्यास अजिबात तयार नाही. आपल्या देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होत नाहीत,’ असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा