जम्मू आणि काश्मीरमधील रामबन येथील बगलिहार धरणाचे दोन दरवाजे गुरुवारी (८ मे) भारताने उघडले. रामबनमध्ये मुसळधार पावसानंतर पाण्याची पातळी वाढल्यानंतर चिनाब नदीवरील बगलीहार धरणाचे (बगलीहार जलविद्युत प्रकल्प धरण) दरवाजे उघडण्यात आले आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जाणारे सर्व धरणाचे दरवाजे बंद केले होते.
रामबनसह जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला आहे. याशिवाय रामबनमध्ये ढगफुटी आणि चिखल कोसळण्याच्या घटनाही घडल्या आहेत. या घटनांमुळे धरणाची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत होती, त्यामुळे आज धरणाचे दरवाजे उघडावे लागले. बागलिहार धरणासोबतच सलाल धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत. एकाच वेळी दोन धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यामुळे पाकिस्तानमध्ये पुराचा धोका निर्माण झाल्याची माहिती आहे.
रामबनमधील ढगफुटीच्या घटनेबद्दल उपायुक्त बसीर-उल-हक चौधरी म्हणाले की, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) प्राधान्य देत आहे आणि ते सामान्य प्रवाशांना आणि वाहनांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांनी वाहतूक सल्लागारानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन, असे आवाहनही त्यांनी केले.
हे ही वाचा :
एकाच वेळी, पाककडून जयशंकर, डोवाल यांचे फूट मसाज आणि युद्धखोरी…
‘ऑपरेशन सिंदूर’: शहर सोडा किंवा सुरक्षित ठिकाणी जा!
भारताचे S-400 अर्थात ‘सुदर्शन चक्र’ कसे पाकिस्तानसाठी ठरले मारक
भारताच्या ड्रोन हल्ल्यात लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त!
दरम्यान, भारताने पाकिस्तानविरुद्ध सुरु केलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरु आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या हल्ल्याला सडेतोड उत्तर भारताच्या सुरक्षा दलाने दिले आहे. काल पिओके आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांना लक्ष्य करत ती उद्ध्वस्त केली. आणि आज ड्रोन हल्ला करत लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उध्वस्त केली. तसेच रावळपिंडी क्रिकेट स्टेडीअमवर देखील भारताने ड्रोन हल्ला केला आहे.