28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेष‘यूपीएचा कार्यकाळ म्हणजे संकटजनक परिस्थिती’

‘यूपीएचा कार्यकाळ म्हणजे संकटजनक परिस्थिती’

केंद्र सरकारतर्फे लोकसभेत भारतीय अर्थव्यवस्थेवर श्वेतपत्रिका

Google News Follow

Related

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी गुरुवारी लोकसभेत भारतीय अर्थव्यवस्थेवर श्वेतपत्रिका मांडली. श्वेतपत्रिकेत यूपीएच्या १० वर्षांच्या शासनकाळातील अर्थव्यवस्थेची १० वर्षांच्या एनडीए शासनाशी तुलना केली आहे.चालू अर्थसंकल्पाच्या शेवटच्या दिवशी श्वेतपत्रिका मांडण्यात आली होती, त्यासाठी एक दिवस वाढवण्यात आला होता. या वर्षी एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वीचे हे सध्याचे लोकसभेचे शेवटचे अधिवेशन आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या आर्थिक कामगिरीची आणि भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या १० वर्षांच्या आर्थिक कामगिरीची तुलना करण्यासाठी सरकारने १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात ‘श्वेतपत्रिका’ काढण्याची घोषणा केली होती.श्वेतपत्रिका इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषांमध्ये तयार करण्यात आली आहे. ५९ पानांच्या श्वेतपत्रिकेत २००४मध्ये यूपीएला निरोगी अर्थव्यवस्थेचा वारसा कसा मिळाला आणि २०१४ मध्ये मनमोहन सिंग सरकारची जागा नरेंद्र मोदी सरकारने घेतली तेव्हा भारतीय अर्थव्यवस्था वाईट अवस्थेत होती, याचा तपशील आहे. या श्वेतपत्रिकेत दोन्ही कालावधीत शेअर बाजारातील विरोधाभासी कल आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या प्रवाहावर प्रकाश टाकण्यात आला आहे.

‘सन २०१४मध्ये जेव्हा आम्ही सरकार स्थापन केले तेव्हा अर्थव्यवस्था नाजूक अवस्थेत होती; आर्थिक गैरव्यवस्थापन आणि आर्थिक अनुशासनहीनता, व्यापक भ्रष्टाचार होता. ही संकटजनक परिस्थिती होती. अर्थव्यवस्थेत टप्प्याटप्प्याने सुधारणा करण्याची आणि शासन व्यवस्था व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी खूप मोठी होती. आमच्या सरकारने तेव्हाच्या बिकट स्थितीवर श्वेतपत्रिका काढण्याचे टाळले. यामुळे नकारात्मक वातावरण निर्माण झाली असती आणि गुंतवणूकदारांसह सर्वांचा विश्वास डळमळीत झाला असता. लोकांना आशा देणे, देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीला आकर्षित करणे आणि अत्यंत आवश्यक असलेल्या सुधारणांसाठी पाठिंबा निर्माण करणे ही काळाची गरज होती,’ असे श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.

‘आमच्या सरकारचा ‘राष्ट्र-प्रथम’ या तत्त्वावर विश्वास होता. राजकीय गुण मिळवण्यावर नाही. आता आम्ही अर्थव्यवस्था स्थिर केली आहे आणि ती पुनर्प्राप्ती आणि वाढीच्या मार्गावर ठेवली आहे. यूपीए सरकारने वारसा म्हणून मागे सोडलेली दिसते ती दुराग्रही आव्हाने सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवणे आवश्यक आहे,’ असेही या श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आली आहे.‘सन २०१४ पूर्वीच्या काळातील प्रत्येक आव्हान आमच्या आर्थिक व्यवस्थापनाद्वारे आणि आमच्या प्रशासनाद्वारे पार केले गेले. याने देशाला शाश्वत उच्च विकासाच्या दृढ मार्गावर आणले आहे. आमची योग्य धोरणे, खरा हेतू आणि योग्य निर्णय यामुळे हे शक्य झाले आहे,’ असे निर्मला सीतारामन म्हणाल्या.

हे ही वाचा:

जीन्सनंतर पायजम्यावर न्यायालयात येण्यास परवानगी द्यायची का?

अभिषेक घोसाळकरांच्या हत्येप्रकरणी मॉरिसच्या पीएसह एकाला घेतलं ताब्यात

‘सगळीकडून दगडफेक होत होती; घरात लपवून वाचवला जीव’

बंगालच्या तुरुंगातील कैदी राहताहेत गर्भवती; १९६ बालकांचा जन्म

श्वेतपत्रिकेत प्रथमतः २०१४मध्ये मोदी सरकारचा कार्यभार स्वीकारला तेव्हा शासन, आर्थिक आणि वित्तीय संकटांचे स्वरूप आणि व्याप्ती यावर प्राधान्याने लक्ष देण्यात आले. दुसरे, अर्थव्यवस्था चांगली, तसेच, पुनर्संचयित करण्यासाठी आणि लोकांच्या विकासाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ती जोमदार आणि सक्षम बनवण्यासाठी एनडीए सरकारने कोणती धोरणे आणि उपाययोजना केल्या, याची माहिती देण्यात आली आहे.श्वेतपत्रिका तीन भागात विभागण्यात आली आहे. पहिल्या भागात यूपीए सरकारच्या काळात भारताच्या स्थूल आर्थिक परिस्थितीची चर्चा केली आहे.

या कालावधीत दुहेरी अंकी चलनवाढ, अत्याधिक कर्ज आणि उच्च धोरणात्मक अनिश्चिततेसह बँकिंग क्षेत्राला फटका बसला होता. त्यामुळे भारताच्या व्यावसायिक वातावरणावर परिणाम झाला आणि त्याची प्रतिमा खराब झाली. वाजपेयींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने सन २००४मध्ये उच्च विकास क्षमता असलेली निरोगी आणि लवचिक अर्थव्यवस्था सुपूर्द करूनही भारताची अर्थव्यवस्था ढासळली, असे त्यात म्हटले आहे.

भाग एकमध्ये मनमोहन सिंग सरकारच्या काळात अर्थव्यवस्थेचे गैरव्यवस्थापन, विविध घोटाळ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर महसुलाचे नुकसान झाले आणि वित्तीय आणि महसुली तूट नियंत्रणाबाहेर गेली. सन २०१४ मध्ये, आमच्या सरकारला वारसाहक्काने नुकसान झालेल्या अर्थव्यवस्थेचा वारसा मिळाला, त्यामुळे स्वयं-शाश्वत दीर्घकालीन आर्थिक वाढ सक्षम करण्यासाठी पुनर्बांधणी करावी लागली, असे या श्वेतपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.

श्वेतपत्रिकेच्या दुसऱ्या भागात यूपीए सरकारच्या विविध भ्रष्टाचार घोटाळ्यांची सद्यस्थिती मांडण्यात आली आहे. तसेच, तिसऱ्या भागात एनडीए सरकारने अर्थव्यवस्थेला कसे वळण लावले, देशाची प्रतिमा कशी उभी केली आणि चांगल्या भविष्यासाठी लोकांच्या आशा आणि आकांक्षा पुन्हा जागृत केल्या, याचे वर्णन केले आहे. आता देश आत्मविश्वासाने पुढे जात आहे, असे त्यात म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा