27 C
Mumbai
Monday, June 16, 2025
घरविशेषविकसित भारतासाठी देशात आधुनिक पायाभूत सुविधांचा महायज्ञ

विकसित भारतासाठी देशात आधुनिक पायाभूत सुविधांचा महायज्ञ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

Google News Follow

Related

राजस्थानच्या बीकानेर येथे आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील ८६ जिल्ह्यांमध्ये नव्याने विकसित करण्यात आलेल्या १०३ ‘अमृत भारत स्टेशन्स’चे उद्घाटन केले. यासोबतच, २६,००० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण देखील केले. सभा संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, “मी आज करणी मातांचे आशीर्वाद घेऊन तुमच्यात आलो आहे. त्यांच्या कृपेने ‘विकसित भारत’ घडवण्याचा आमचा संकल्प आणखी दृढ होत आहे. काही वेळापूर्वीच २६ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे येथे शिलान्यास व लोकार्पण झाले आहे. मी देशवासीयांना, राजस्थानमधील माझ्या बंधू-भगिनींना यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “विकसित भारत घडवण्यासाठी आज देशभरात आधुनिक पायाभूत सुविधांचे एक भव्य महायज्ञ सुरू आहे. आपले रस्ते, विमानतळ, रेल्वे व स्टेशन आधुनिक बनावीत यासाठी गेल्या ११ वर्षांपासून अभूतपूर्व गतीने काम सुरू आहे. यापूर्वी जितका निधी देश या कामांवर खर्च करत होता, त्याच्या तुलनेत आज ६ पट अधिक निधी खर्च केला जात आहे.

हेही वाचा..

पंतप्रधान मोदी यांनी केले देशनोक स्टेशनचे उद्घाटन

जाणून घ्या दशमूलाचे चमत्कारी फायदे

नैसर्गिक आतड्यांच्या स्वच्छतेचे उपाय जाणून घ्या !

किश्तवाडमध्ये अनेक अतिरेक्यांना घेराव

ते पुढे म्हणाले, “आम्ही एकाचवेळी देशभरातील १३०० हून अधिक रेल्वे स्टेशनना आधुनिक रूप देत आहोत. या नव्या स्टेशनना ‘अमृत भारत स्टेशन’ असे नाव देण्यात आले आहे. यातील १०० पेक्षा अधिक स्टेशन आज पूर्ण झालेली आहेत. भारतातील हे प्रगतीशील काम पाहून संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. आज भारत स्वतःच्या रेल्वे नेटवर्कचेही आधुनिकीकरण करत आहे. ‘वंदे भारत’, ‘अमृत भारत’, ‘नमो भारत’ ट्रेन हे देशाच्या नव्या गतीचे आणि प्रगतीचे प्रतीक आहेत.”

रेल्वे विकास कार्यांचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “सध्या देशात सुमारे ७० मार्गांवर ‘वंदे भारत’ गाड्या चालत आहेत. त्यामुळे अतिदूर भागांपर्यंत आधुनिक रेल्वे सेवा पोहोचली आहे. गेल्या ११ वर्षांत शेकडो रोड ओव्हरब्रिज व अंडरब्रिज बांधले गेले आहेत. ३४,००० किमीहून अधिक नव्या रेल्वे लाईन टाकण्यात आल्या आहेत. ‘विकासही आणि वारसाही’ या मंत्राचे प्रत्यक्ष दर्शन या अमृत भारत स्टेशनवर होते. ती स्थानिक कला आणि संस्कृतीचे प्रतीकही ठरत आहेत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चूरू-सादुलपूर (५८ किमी) रेल्वे मार्गाची पायाभरणी केली. याशिवाय, सूरतगड-फलोदी (३३६ किमी), फुलेरा-डेगाना (१०९ किमी), उदयपूर-हिम्मतनगर (२१० किमी), फलोदी-जैसलमेर (१५७ किमी), आणि समदडी-बाडमेर (१२९ किमी) रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण यांचा समावेश असलेल्या, एकूण २६,००० कोटी रुपये खर्चाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोकार्पण आणि राष्ट्रार्पण केला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा