29.6 C
Mumbai
Saturday, June 27, 2026
घरविशेषकतारमधील रास लफ्फान दुर्घटनेतील मृत भारतीयांचे पार्थिव भारतात रवाना

कतारमधील रास लफ्फान दुर्घटनेतील मृत भारतीयांचे पार्थिव भारतात रवाना

भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी जखमींची घेतली भेट

Google News Follow

Related

कतारमधील रास लफ्फान इंडस्ट्रियल सिटी येथे झालेल्या औद्योगिक दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्व १२ भारतीय नागरिकांचे पार्थिव भारतात पाठवण्यात आले असल्याची माहिती दोहा येथील भारतीय दूतावासाने दिली. तसेच दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी भारतीय कामगारांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये भारतीय दूतावासाने म्हटले आहे, “रास लफ्फान दुर्घटनेत दुर्दैवाने मृत्यू झालेल्या आठ भारतीय नागरिकांचे पार्थिव २६ जून रोजी भारतात पाठवण्यात आले. यापूर्वी २५ जून रोजी आणखी चार जणांचे पार्थिव स्वदेशी रवाना करण्यात आले होते.”

दूतावासाने पार्थिव भारतात पाठवण्याच्या प्रक्रियेत सहकार्य करणाऱ्या सर्व संबंधितांचे आभार मानले. “भारतीय दूतावास, कतारमधील संबंधित अधिकारी, भारतीय समुदायातील संघटना तसेच भारतातील सरकारी यंत्रणांनी दिलेल्या तातडीच्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत,” असे दूतावासाने नमूद केले.

दूतावासाने सांगितले की, राजदूत आणि दूतावासातील अधिकाऱ्यांनी अल खोर येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या काही जखमी भारतीय नागरिकांची भेट घेतली. सर्व जखमींना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, त्यासाठी कतार सरकार आणि संबंधित नियोक्ता कंपनीचेही दूतावासाने आभार मानले आहेत.

रास लफ्फान इंडस्ट्रियल सिटीमध्ये झालेल्या या भीषण औद्योगिक दुर्घटनेत १२ भारतीयांसह एकूण १३ जणांचा मृत्यू झाला, तर ६६ जण जखमी झाले. दुर्घटनेनंतर भारत आणि कतार सरकारने समन्वय साधत जखमींवर उपचार आणि मृतांच्या पार्थिवांना स्वदेशी पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण केली. कतारच्या गृह मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, रास लफ्फान इंडस्ट्रियल सिटीतील एका कारखान्यात काम सुरू असताना तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडला.

कतार ऊर्जा मंत्रालयाने एक्सवरील निवेदनात सांगितले की, २१ जून २०२६ रोजी सायंकाळी बरजान लोकल गॅस सप्लाय फॅसिलिटीमध्ये प्रकल्प सुरू करण्याच्या प्रक्रियेदरम्यान ऑपरेशनल बिघाड झाला. त्यानंतर भीषण स्फोट होऊन आग लागली आणि मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कतारचे अमिर शेख तमीम बिन हमद अल थानी यांनी दूरध्वनीद्वारे व्यक्त केलेल्या शोकसंवेदनेबद्दल त्यांचे आभार मानले.

हे ही वाचा:

इस्रायल-लेबनॉन-अमेरिका त्रिपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या; शांततेच्या दिशेने पहिले पाऊल

व्हेनेझुएलात ५० हजार लोक बेपत्ता, पुन्हा भूकंपाचे धक्के

ओमानजवळ जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने

भारतात ४५°C… तरी निभावतो! पण ब्रिटनमध्ये ३५°C होताच लोक हैराण; नेमकं असं का?

पंतप्रधान मोदी म्हणाले, “रास लफ्फान इंडस्ट्रियल सिटीतील दुर्दैवी दुर्घटनेत भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल दूरध्वनी करून शोक व्यक्त केल्याबद्दल मी कतारच्या अमिरांचे आभार मानतो. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत आणि जखमी नागरिकांच्या लवकरात लवकर प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करतो.” ते पुढे म्हणाले की, भारत आणि कतार हे दोन्ही देश आपल्या नागरिकांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध असून, अशा कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
318,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा