34 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरविशेषचांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

चांद्रयान ३, जी-२० परिषदेने भारताला शिखरावर नेले!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये केले वर्णन

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकप्रिय ‘मन की बात’ हा रेडिओ कार्यक्रम आज पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी ‘चांद्रयान-३’ चंद्रावर उतरवण्यापासून ते G२० चे यश तसेच भारतीय तरुणांसाठी एक उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती दिली. आज ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १०५ वा भाग होता. G२० च्या प्रचंड यशानंतर हा पहिला कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यातून कशाप्रकारे संदेश मिळत आहेत, याबाबत पंतप्रधान मोदींनी सांगितले.

मन की बातमध्ये पीएम मोदी म्हणाले की, चांद्रयान-३ च्या यशानंतर जी-२० ला ज्या प्रकारे यश मिळाले आहे, त्यामुळे प्रत्येक भारतीयाचा आनंद द्विगुणित झाला आहे. भारत मंडपम एखाद्या सेलिब्रिटीसारखा झाला आहे. ते म्हणाले की, आफ्रिकन युनियनला G२० चा सदस्य बनवून भारताने आपली क्षमता सिद्ध केली आहे. आफ्रिकन युनियन हा ५१ आफ्रिकन देशांचा समूह आहे, ज्यांना नवी दिल्ली येथे झालेल्या G२० मध्ये या गटाचे सदस्य बनवण्यात आले होते.

देशाच्या यशाबाबत…
पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘मला पुन्हा एकदा माझ्या देशाचे आणि देशवासीयांचे यश शेअर करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांत, मला चांद्रयान-३ चे लँडिंग आणि दिल्लीतील G२० च्या यशाबाबत अनेक संदेश आले आहेत.’ ते म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकातून मला अनेक संदेश मिळाले आहेत. चांद्रयान-३ चे लँडिंग कोट्यवधी लोकांनी पाहिले. इस्रोच्या यूट्यूब चॅनलवर ही संपूर्ण घटना ८० लाख लोकांनी पाहिली. हा स्वतःच एक विक्रम आहे.

‘इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर
पंतप्रधान मोदींनी रेडिओ कार्यक्रमात सिल्क रूटवर चर्चा केली. या मार्गाने व्यापार कसा होत असे याबाबत सांगितले. G२० मध्ये ‘इंडिया-मिडल ईस्ट-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर’ सुचवण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. हा कॉरिडॉर पुढील शेकडो वर्षांसाठी जागतिक व्यापाराचा आधार बनेल. या कॉरिडॉरचा पाया भारतीय भूमीवर घातला गेला होता याची नोंद इतिहासात राहणार असल्याचे मोदींनी सांगितले.

‘बापूंचे विचार आजही समर्पक’
पीएम मोदी म्हणाले, “दिल्लीतील G-२० शिखर परिषदेदरम्यान, बापूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक जागतिक नेते राजघाटावर एकत्र आले होते, ते दृश्य कोण विसरू शकेल. बापूंना जगभरात आदरांजली आहे याचा हा मोठा पुरावा आहे. “त्याच्या कल्पना आजही किती समर्पक आहेत?

‘भारतात जागतिक वारसा स्थळांच्या संख्येत सातत्याने वाढ
पंतप्रधान म्हणाले की, भारतातील जागतिक वारसा स्थळांची संख्या आता ४२ वर पोहोचली आहे. आपली अधिकाधिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठिकाणे जागतिक वारसा म्हणून ओळखली जावीत यासाठी भारताचा प्रयत्न आहे. पंतप्रधान म्हणाले की, भारतात अनेक जागतिक वारसा स्थळे आहेत. काही दिवसांपूर्वीच कर्नाटकातील शांतीनिकेतन आणि पवित्र होयसाडा मंदिरांना जागतिक वारसा घोषित करण्यात आले आहे.

‘जागतिक पर्यटन दिनानिमित्त भारतातील विविधतेला भेट द्या’
पंतप्रधान मोदींनी देशवासियांना जागतिक पर्यटन दिनाची आठवण करून दिली. ते म्हणाले, “२७ सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे, काही लोक पर्यटनाकडे केवळ प्रेक्षणीय स्थळ म्हणून पाहतात, परंतु पर्यटनाचा एक फार मोठा पैलू रोजगाराशी निगडीत आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही कुठेतरी फिरण्याचा विचार करत असाल तर काहीतरी तयार करा, मग भारताची विविधता पाहण्याचा प्रयत्न करा.” पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भारताविषयीचे आकर्षण वाढले आहे आणि G-२० च्या यशस्वी संघटनेनंतर जगभरातील लोकांचे आकर्षण भारताकडे वाढले आहे.

हे ही वाचा:

भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध केल्याबद्दल ‘मोटोजीपी’कडून माफी

खलिस्तानी दहशतवादी निज्जरचे पंजाबमधील घर जप्त होणार

हरदीपसिंग निज्जर कॅनडात दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र चालवायचा!

आईच्या मृत्यूनंतरही पोलिसाने कर्तव्य निभावले; पंतप्रधान झाले भावूक

 

भारतीय तरुणांसाठी ‘G२० युनिव्हर्सिटी कनेक्ट प्रोग्राम’
पीएम मोदी म्हणाले, “दिल्लीमध्ये आणखी एक रोमांचक कार्यक्रम होणार आहे. G-२० युनिव्हर्सिटी कनेक्ट प्रोग्राम. या कार्यक्रमाद्वारे देशभरातील लाखो विद्यापीठातील विद्यार्थी एकमेकांशी जोडले जातील. यामध्ये आयआयटी, आयआयएम, एनआयटीचे विद्यार्थी. आणि अनेक नामांकित संस्थांसारखी वैद्यकीय महाविद्यालयेही यात सहभागी होतील. मला आवडेल की तुम्ही जर महाविद्यालयीन विद्यार्थी असाल तर २६ सप्टेंबर रोजी होणारा हा कार्यक्रम तुम्ही जरूर पहा आणि त्यात सहभागी व्हा.”

११ परदेशी भाषांमध्ये प्रसारण
‘मन की बात’ कार्यक्रम फ्रेंच, चायनीज, इंडोनेशियन, तिबेटी, बर्मी, बलुची, अरबी, पश्तू, पर्शियन अशा ११ परदेशी भाषांशिवाय २२ भारतीय भाषा आणि २९ बोलींमध्ये प्रसारित केला जातो. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या ५०० हून अधिक केंद्रांवरून प्रसारित केला जातो.

भारताच्या संगीताची कैसमी दिवाणी
प्रधानमंत्री मोदींनी आपल्या कार्यक्रमात सांगितले की,कैसमी ही सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर सध्या खूप चर्चेत आहे.कैसमी ही मूळची जर्मनी मध्ये राहणारी असून ती आतापर्यंत कधीही भारतात आली नाही मात्र ती भारताच्या संगीताची वेडी असल्याचे मोदींनी सांगितले.कैसमीने भारताला अजून पाहिलेही नाही तरीसुद्धा तिच्या मनात असलेली भारतीय संगीताची रुची हे प्रेरणादायी असल्याचे मोदींनी सांगितले.

घोडा पुस्तकालय
प्रधानमंत्री मोदी म्हणाले, उत्तराखंड मधील नैनिताल जिल्ह्यात काही तरुणांनी लहान मुलांसाठी घोडा पुस्तकालयाची सुरुवात केली.या घोडा पुस्तकालयाचे वैशिष्ट्य म्हणजे दुर्गम भागातील मुलांना पुस्तके पाठवण्याचे काम हे या उपक्रमातून करण्यात येत आहे आणि विशेष म्हणजे ही सेवा अगदी निःशुल्क पद्धतीने पार पाडली जाते.आतापर्यंत या योजनेद्वारे नैनिताल जिल्ह्यातील १२ गावांना पुस्तके वाटण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा