जम्मू आणि काश्मीरच्या कुलगाम येथील २३ वर्षीय युवकाचा मृतदेह एका ओढ्यातून सापडला आहे. त्याला दहशतवादी संबंधांच्या संशयावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, तो पळून जाण्याच्या प्रयत्नात ओढ्यात उडी मारून बुडाला, तर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिस कोठडीत हत्या झाल्याचा आरोप केला आहे.
मृत युवकाची ओळख इम्तियाज अहमद म्हणून झाली आहे. पोलिसांनी त्याला लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर सेलचा सदस्य असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी इम्तियाजला एका लपलेल्या ठिकाणाची ओळख पटवण्यासाठी नेले असता, तो वेगाने वाहणाऱ्या वैषाव ओढ्यात उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न करताना बुडाला.
पोलिसांनी सांगितले की, २३ एप्रिल रोजी झालेल्या चकमकीच्या तपासादरम्यान इम्तियाजचे नाव समोर आले, ज्यामध्ये दोन दहशतवादी सुरक्षा दलांशी झालेल्या गोळीबारानंतर पळून गेले होते. चौकशीदरम्यान इम्तियाजने लष्करच्या लपलेल्या ठिकाणाबद्दल माहिती दिली होती आणि त्यानंतर त्याला तिथे नेण्यात आले होते.
पोलिसांनी ड्रोन फुटेजही प्रसिद्ध केले आहे, ज्यामध्ये इम्तियाज वैषाव ओढ्यात उडी मारताना आणि वाहून जाताना दिसतो.
तथापि, इम्तियाजच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे म्हणणे फेटाळले असून, त्यांनी कटकारस्थानाचा आरोप केला आहे आणि पोलिस कोठडीत हत्या झाल्याचा दावा केला आहे.
ही घटना कुलगाममधील तीन बेपत्ता गुज्जर तरुणांचे मृतदेह वैषाव ओढ्यातून सापडलेल्या आधीच्या घटनेशी तुलना केली जात आहे. त्या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. या घटनेमुळे केंद्रशासित प्रदेशभर प्रचंड संताप पसरला आहे आणि अनेक राजकीय नेत्यांनी जबाबदारीची मागणी केली आहे.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी सांगितले की, ही घटना काही गंभीर प्रश्न निर्माण करते. प्रशासनावर कटकारस्थानाचा आरोपही त्यांनी केला.
हे ही वाचा:
पाकिस्तान भारताशी लढू शकेल, पण फक्त चार दिवस
पंजाब: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोघांना अटक!
योगी सरकारची नेपाळ सीमेवर कारवाई, ८० हून अधिक मदरसे सील!
अभिनेत्री वाणी कपूरने ‘अबीर गुलाल’ चित्रपटाच्या पोस्ट इंस्टावरून हटवल्या?
त्यानंतर राज्याच्या मंत्री सकीना इतू यांनी इम्तियाजच्या घरी भेट दिली आणि घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इतू यांनी सांगितले की मृत व्यक्तीविरुद्ध पोलिसांच्या नोंदींमध्ये काहीच आक्षेपार्ह नव्हते.
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी, जेणेकरून सत्य बाहेर येईल,” असे त्या म्हणाल्या.
२२ एप्रिल रोजी लष्करशी संबंधित दहशतवादी संघटनेने जम्मू-काश्मीरच्या पहलगाम भागातील बैसरण व्हॅलीमध्ये २६ लोकांची, मुख्यतः पर्यटकांची हत्या केली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणावर दहशतवादविरोधी मोहीम राबवली आणि अनेक व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले.