मध्य प्रदेशातील रतलाम येथे दिवाळी साजरी करण्यावरून तणाव निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहल्ला गणेश नगर (मोहन नगरजवळ) येथे राहणाऱ्या हिंदू महिला रश्मी चौहान यांनी आपल्या घरासमोर दिवा लावून आणि फटाके फोडून दिवाळी साजरी केली.
याच दरम्यान, शेजारी राहणाऱ्या वसीम यांच्या पत्नी रानी यांनी विरोध केला आणि म्हटले की तिच्या घरासमोर फटाके फोडू नयेत. यावरून वाद वाढला आणि रानी, नाजमीन, गुडिया आणि सानिया या चौघींनी मिळून रश्मीची केसांना धरून ओढत मारहाण केली.