30.1 C
Mumbai
Wednesday, May 14, 2025
घरसंपादकीयआता कुठे खेळ सुरू झालाय...

आता कुठे खेळ सुरू झालाय…

दहशतवादी तर ढगात गेले, परंतु त्यांचे आश्रयदाते जिवंत आहेत

Google News Follow

Related

पहेलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी निर्दोष भारतीय पर्यटकांचा बळी घेतला. भारत याचा पुरेपुर वचपा काढणार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला समजेल इतक्या उच्चारवाने सांगितले होते. ‘कल्पनेत विचार केला नसेल असा पाकिस्तानला धडा शिकवू’, हे शब्द त्यांनी खरे करून दाखवले. पाकिस्तानवर भारतीय सैन्य दलाने २४ क्षेपणास्त्र डागली. पीओकेमध्ये पाच ठिकाणी आणि पाकिस्तानच्या पंजाबमध्ये चार ठिकाणी दणका दिला. परंतु पाकिस्तान गपगुमान आहे. ‘भारताने
पुढे काही केले नाही’, तर आम्हीही काही करणार नाही, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ सांगतायत. हे तेच ख्वाजा आसिफ आहेत, जे दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते, ’आम्ही शिल्लक राहिलो नाही, तर कोणीही राहणार नाही’. मोदींनी त्यांना अण्वस्त्र विसरायला लावली.

७ मे हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहीला जाईल. भारताच्या गृहमंत्र्यांनी जाहीर केले होते की, सायंकाळी ७ वाजता मॉक ड्रील होईल. परंतु भारताने पहाटेच्या अंधारात पाकिस्तानमध्ये ड्रील करून टाकले. या हल्ल्यात तिन्ही सैन्य दलांचा वापर करण्यात आला. पाकिस्तानच्या पंजाबपर्यंत हल्ल्याचे हादरे बसले. भारताने नव्याने खरेदी केलेल राफेल आणि भारतीय बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्राची पाकिस्तानवर यशस्वी चाचणी करून घेतली. भारताने केलेली ही दुसरी मोठी कारवाई होती. दुसरी अशासाठी की सिंधू पाणी वाटप करार स्थगित करून भारताने या आधीच पाकिस्तानला मोठा झटका दिला होता. पाकिस्तानच्या मुळावर घाव घातला होता. चिनाबचे पात्र सुकल्याचे, या कोरड्या पात्रात पाकिस्तानी
नागरिक फेरफटका मारतायत, असे व्हीडियो पाकिस्तानमध्ये प्रचंड व्हायरल झाले होते. पाकिस्तान शेतीवर जगतो. त्याचे पाणी तोडून पाकिस्तानी अर्थकारणाला बुडवण्याचे काम मोदींनी केले आहे.

पाकिस्तानवर दूरगामी परिणाम करणारा हा निर्णय आहे. पाकिस्तानचा घसा कोरडा झाला होता. हा हल्ला टाळण्यासाठी पाकिस्तानच्या बहुतेक नेत्यांनी, मुत्सद्यांनी आमच्याक़डे अणुबॉम्ब आहे. भारताने हल्ला केला तर अणुयुद्ध भडकेल’, अशी विधाने करून जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. पाकिस्तानचा रेलमंत्री मोहमद हनीफ अब्बास, संरक्षण मंत्री ख्वाजा
आसिफ, रशियातील पाकिस्तानचा राजदूत मोहमद खालीद जमाली यांचा या बडबोल्यांमध्ये समावेश आहे. ‘आमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला, तर कोणीच शिल्लक राहणार नाही’, अशी उघड धमकी पाकिस्तानचा संरक्षण मंत्र देत होता. खरे तर सिंधू जल करार स्थगित करण्यात आल्यापासून या धमक्या सुरू झाल्या. ‘सिंधू दरीया मे अगर पानी नही बहेगा, तो हिंदुस्तान का लहू बहेगा…’, ‘इतने हिंदू मारेंगे की अंत्यसंस्कार के लिये लकडीया कम पडेगी…’ अशा वाह्यात धमक्या दिल्या जात होत्या. परंतु नद्यांचे पाणी रोखल्यानंतर किंवा आज पहाटे पाकिस्तानवर २४ क्षेपणास्त्र डागल्यानंतरही पाकिस्तानची हिंमत झालेली नाही. ‘या पुढे भारत काही करणार नसेल तर आम्हीही शांत राहू’, असे ख्वाजा आसिफचे ताजे विधान आहे.

ही विधाने का येत होती, हे मोदींना ठाऊक होते. भारताकडे पाकिस्तानची खडानखडा माहिती होती. नदीच्या पात्रात पाणी नाही. रणगाड्यांमध्ये टाकायला तेल नाही. तोफांसाठी गोळे नाही, अशा परिस्थितीत असलेल्या पाकिस्तानला भारताचा हल्ला सोसवणार नाही हे त्यांना ठाऊक होते. परंतु तरीही भारताने हे पाऊल उचलण्यापूर्वी प्रचंड तयारी केली होती. युद्धाचा भडका उडाला तरी पाकिस्तानला कसे चेपायचे याची रणनीती तयार होती. सैन्याची तिन्ही दले त्यासाठी
सज्ज कऱण्याची गरज होती. गेल्या चौदा दिवसांत नेमके तेच सुरू होते. भारताने केवळ अणुबॉम्बच्या धमकीच्या चिंधड्या उडवल्या नाहीत, चीन पाकिस्तानच्या मदतीला येईल, या भीतीचाही कडेलोट केला.

हे शक्य झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्धारामुळे. ५६ इंचाच्या छातीमुळे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तर त्याला मोदी जबाबदार आणि पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले तर मोदींनी काय केले? हे तर सैन्याचे यश… ही चलाखी भारतातील मोदी विरोधक जरूर करतील. सैन्याचे यश आहेच, परंतु राजकीय इच्छाशक्ती शिवाय ते शक्य झाले असते का? फक्त सैन्याच्या इच्छेने होत असते तर २६/११ च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला दणका मिळाला नसता का? भारताचे हवाईदल प्रमुख फली होमी मेजर यांनी हल्ल्याची तयारी दाखवलीच होती ना? परंतु त्यांना मोकळीक देण्याचे धाडस पंतप्रधान
डॉ.मनमोहन सिंह यांच्यात नव्हते.

आजच्या हल्ल्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुजफ्फराबादेतील बिलाल मशीद आणि पंजाब प्रांतातील बहावलपूर मधील मशीद नष्ट कऱण्यात आली. भारताने स्पष्ट इशारा दिला, जिथे दहशतवादी आश्रय घेतील, असे एकही ठिकाण सुटणार नाही. दहशतवादी मसूद अजहरच्या परिवारातील १४ जणांची रवानगी थेट अल्लाकडे झाली असल्याची बातमी व्हायरल झालेली आहे. पाकिस्तानमध्ये जनाजे उठतायत, असे व्हीडियो मोठ्या संख्येन व्हायरल झालेले आहेत. स्मशान शांतता पसरलेली आहे. दहशतवाद्यांच्या कपाळात गेलेल्या आहेत. मेरा नंबर कब आयेगा, अशी वाट तिथले मौत के सौदागर पाहतायत. पाकिस्तानला किती मोठा फटका बसला आहे, हे येत्या दोन-तीन दिवसांत अधिक स्पष्ट होईल.

हे ही वाचा:

जम्मूसह ५ नव्या आयआयटी संस्थांच्या विस्तारास केंद्राची मंजुरी

१० मेपर्यंत काही फ्लाइट्स रद्द

जितके सुंदर, तितकेच अद्भुत कमळ

‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल पर्यटक काय म्हणतायत ?

पाकिस्तानमध्ये मिया चन्नू… प्रकरणाची पुनरावृत्ती झालेली दिसते. रडार यंत्रणा पुन्हा फसली, चीनने पाकिस्तानला दिलेली ही यंत्रणा चिनी लढाई विमानां इतकीच भंगार निघाली. भारतातील बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात चीनी बनावटीचे जेएफ-१७ थंडर नष्ट करण्यात भारताला यश आले. जो चीनवरी विसंबला, त्याचा पाकिस्तान झाला, ही नवी म्हण आता प्रचलित व्हायला हरकत नाही. भारताने पहाटे केलेल्या कारवाईनंतर लाहोरमध्ये म्हणे पाकिस्तानी रणगाडे रस्त्यावर फिरायला लागले. हे घबराटीतून घडले की जनतेला दाखवायला हे कळायला मार्ग नाही. पाकिस्तानने अजून प्रत्युत्तर दिलेले
नाही. ते दिले जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे विषय संपला असे मानावे का? त्याची शक्यता खूप कमी आहे.

माजी लष्कर प्रमुख  मनोज नरवणे यांनी एक्सवर पोस्ट केलेली आहे. पिक्चर अभी बाकी है… ही पोस्ट बोलकी आहे. कारण पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, हे सत्य. परंतु ते अड्डे अजून संपलेले नाहीत. मसूद अजहर, हाफीज सईद, दाऊद इब्राहीम अजून जिवंत आहेत. पहेलगामचा कर्ताकरविता जनरल आसिफ मुनीर जिवंत आहे. दहशतवादी तर ढगात गेले, परंतु त्यांचे आश्रयदाते जिवंत आहेत, तो पर्यंत मोदींनी देशाला दिलेला शब्द पूर्ण होत नाही. त्यामुळे खेळ संपलेला नाही. आता कुठे सुरू झालेला आहे. ऑपरेशन सिंदूर हा पहीला भाग फक्त रिलीज झाला आहे. सिंदूर रिर्टन्स, अजून बाकी आहे. भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर मीडियाला सामोरे जाऊन तोंड काळ करून घेता येत पाकिस्तानचे राजकीय नेते परंतु ज्यांच्या दुसावासामुळे पहिलगामचा दहशतवादी हल्ला घडला ते जनरल असे मुनीर मात्र गायब आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
248,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा