29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरराजकारणद्राैपदी मुर्मू साेमवारी घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ; २१ ताेफांची सलामी देणार

द्राैपदी मुर्मू साेमवारी घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ; २१ ताेफांची सलामी देणार

Google News Follow

Related

द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५व्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकून इतिहास रचला आहे. त्या देशातील आदिवासी समाजातील पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. आपले प्रतिस्पर्धी यशवंत सिन्हा यांचा मोठ्या फरकाने पराभव करत त्यांनी हा विजय संपादन केला आहे. आता या विजयानंतर द्रौपदी मुर्मू सोमवारी २५ जुलै २०२२ रोजी राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांना २१ ताेफांची सलामी देण्यात येणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांच्या विजयामुळे एनडीएमध्ये आनंदाची लाट उसळली असून, देशातील सर्व राज्यांतील नेत्यांनी त्यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे.

सोमवारी सकाळी १०.१५ वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा होणार आहे. सर्वाेच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ देतील. यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांना २१ तोफांची सलामी देण्यात येणार आहे . त्यानंतर राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल.

समारंभापूर्वी मावळते राष्ट्रपती आणि निर्वाचित राष्ट्रपती संसदेत पोहोचतील. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मंत्री परिषदेचे सदस्य, राज्यपाल, मुख्यमंत्री, राजनैतिक मिशनचे प्रमुख, संसद सदस्य आणि सरकारी नागरी आणि लष्करी अधिकारी प्रमुख उपस्थित राहणार आहेत. समारंभ संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये समारंभाच्या समारोपाच्या वेळी, राष्ट्रपती ‘राष्ट्रपती भवन’कडे रवाना हाेतील. तिथे त्यांना ‘इंटर-सर्व्हिस गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात येईल आणि मावळत्या राष्ट्रपतींचा शिष्टाचार पूर्वक सन्मान करण्यात येईल.

हे ही वाचा:

ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!

मविआ सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी होती!

अग्निपथमध्ये नौदल प्रवेशासाठी महिलांची पसंती

दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

२५ जुलैला आतापर्यंत किती राष्ट्रपतींनी शपथ घेतली ?

देशात आतापर्यंत एकूण ९ राष्ट्रपती झाले आहेत, ज्यांनी २५ जुलै रोजी पदाची शपथ घेतली आहे. यातील पहिले नाव देशाच्या सहाव्या राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचे आहे. २५ जुलै १९७७ रोजी त्यांनी देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. खरे तर इंदिरा गांधींच्या सरकारने देशात आणीबाणी लागू केली, त्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी पहिल्यांदाच त्यांची निवड झाली तेव्हा जनता पक्षाच्या नेत्या नीलम संजीव रेड्डी यांचा विजय झाला होता.

शपथ २५ जुलैलाच का घेतली जाते?

यामागे कोणतेही विशेष कारण नाही. खरेतर, देशाच्या सहाव्या राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी २५ जुलै रोजी पदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांच्यानंतर कार्यकाळ पूर्ण केलेल्या सर्व राष्ट्रपतींनी त्याच तारखेला पदाची शपथ घेतली. नीलम संजीव रेड्डी यांच्यानंतर आतापर्यंत देशातील ८ राष्ट्रपतींनी आपला कार्यकाळ पूर्ण केला आहे. २४ जुलै रोजी रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळही पूर्ण होणार आहे, त्यामुळेच २५ जुलै रोजी द्रौपदी मुर्मू देशाच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा