पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पेकाट मोडण्याचे आदेश, सेना दलांना दिले होते. ७ मे रोजी याची सुरुवात झाली. पुढे चार दिवसांत सेनादलांनी पाकिस्तानचा कार्यक्रम करून टाकला. आता मोदी पाकिस्तानचे नरेटीव्ह वॉर उद्ध्वस्त करण्याच्या कामाला लागले आहेत. आदमपूर हवाईतळाला भेट देऊन त्यांनी याची सुरूवात केलेली आहे. एस-४०० सोबत झळकलेली मोदींची छवी पाकिस्तानच्या थापांच्या चिंधड्या उडवून गेली. आदमपूर हवाईतळासोबत भारताचे २६ लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा करणारे पाकिस्तानी नेते आणि लष्करी अधिकारी तोंडावर पडले. विरोधकांनी सुरू केलेल्या देशी नरेटीव्हला चूड लावण्याचे काम त्यांना आता करावे लागणार आहे.
