28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरविशेष‘नेल्सन-दैनिक भास्कर सर्वेक्षणा’त ‘इंडी’ आघाडीचा बनावट अंदाज

‘नेल्सन-दैनिक भास्कर सर्वेक्षणा’त ‘इंडी’ आघाडीचा बनावट अंदाज

वृत्तपत्राकडून कायदेशीर कारवाईचा इशारा

Google News Follow

Related

इंडि आघाडीच्या नेत्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी एक कथित सर्वेक्षण शेअर केले आहे. ‘नेल्सन-दैनिक भास्कर’ सर्वेक्षणाने इंडि आघाडीला मोठा विजय मिळेल, अशी भविष्यवाणी केल्याचा दावा त्यांनी केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत इंडि आघाडीला ३२६ जागा मिळतील, असा दावा या सर्वेक्षणात केल्याचे काँग्रेसचे समर्थक सांगत आहेत.
काँग्रेस पक्षाच्या दक्षिण भारतीय सेलच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सदस्या लक्ष्मी नायर यांनी तथाकथित सर्वेक्षणात इंडि गटाच्या विजयाची बढाई मारली. त्यांनी या सर्वेक्षणातील प्रदेशनिहाय सर्वेक्षणही प्रसिद्ध करून दिल्लीवरून भाजपचा नामशेष होईल आणि महाराष्ट्र, पश्चिम बंगाल इत्यादी राज्यांमध्ये त्यांना मोठा फटका बसेल, असा दावा केला आहे.

काँग्रेस समर्थकांनी शेअर केलेल्या सर्वेक्षणानुसार, १३ एप्रिल रोजी दैनिक भास्करच्या भोपाळ आवृत्तीच्या पहिल्या पानावर ‘नेल्सन-दैनिक भास्कर सर्वेक्षण’ ही प्रमुख बातमी होती, ज्यामध्ये इंडि आघाडीचा विजय दिसून येत होता. सर्वेक्षणाच्या निकालांचे राज्यनिहाय सर्वेक्षणही करण्यात आले होते. ज्यात अनेक राज्यांमध्ये विरोधी गट एनडीएच्या पुढे असल्याचे दाखवण्यात आले होते. तसेच, इंडि आघाडी दक्षिणेकडील राज्यांमध्ये निवडणुकीत विजय मिळवत आहे आणि सध्याच्या भाजपशासित राज्यांमध्ये लक्षणीय फायदा मिळवत आहे, असे भाकीत या सर्वेक्षणात करण्यात आले आहे. तसेच, जर आज मतदान झाले तर इंडि आघाडी ३२६ जागा जिंकेल, एनडीए १९४ जागा जिंकेल आणि २३ जागा इतरांना मिळतील, असेही यात नमूद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला.तथापि, हे वृत्तपत्राचे कात्रण संपूर्णपणे बनावट आहे आणि दैनिक भास्करने १३ एप्रिल रोजी असे कोणतेही सर्वेक्षण प्रकाशित केले नाही.

हे ही वाचा:

संदेशखालीत मानवाधिकारांचे उल्लंघन!

इराणने जप्त केलेल्या इस्रायलशी संबंधित जहाजावर १७ भारतीय!

रोड शो दरम्यान दगडफेकीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जखमी!

बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या बंगल्याबाहेर गोळीबार!

जेव्हा दैनिक भास्करच्या हिंदी बातम्यांच्या मास्टहेडसह कथित सर्वेक्षण सोशल मीडियावर फिरू लागले तेव्हा चुकीची माहिती दूर करण्यासाठी वृत्तपत्राने जाहीरपणे हे सर्वेक्षण खोटे असल्याचे स्पष्ट केले. तसेच, आपल्या नावाने खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणीही वृत्तपत्राने केली आहे.१३ एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता, दैनिक भास्करने ट्विट करून हे सर्वेक्षण खोटे असून ते काही असामाजिक तत्वांनी तयार केल्याचा दावा केला. तसेच, दैनिक भास्कर अशा कोणत्याही मजकुरावरदावा करत नाही. अशा लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करून त्यांनी भारतीय निवडणूक आयोगालाही टॅग केले.

तसेच, दैनिक भास्करचे राष्ट्रीय संपादक, एल. पी. पंत यांनीही बनावट बातम्या देणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे जाहीर केले. पत्रकार परंजॉय गुहा ठाकुरता यांनीही हे बनावट सर्वेक्षण पोस्ट केले होते. त्यावर त्यांनी “सर, दैनिक भास्करने असे कोणतेही सर्वेक्षण केलेले नाही. भास्करच्या मास्टहेडचा वापर करून बनावट सर्वेक्षण करण्यात आले आहे. शेअर करण्यापूर्वी तुम्ही त्याची सत्यताही तपासली पाहिजे. दैनिक भास्कर तुमच्या पोस्टवर कायदेशीर कारवाई करेल,’ असे म्हटले. एलपी पंत यांच्या प्रतिसादानंतर परंजॉय गुहा ठाकुरता यांनी ट्विट हटवले, परंतु बनावट सर्वेक्षण पोस्ट करणारे इतर बहुतेक ट्विट ऑनलाइन राहिले.वृत्तपत्राने हे सर्वेक्षण खोटे असल्याचे निदर्शनास आणल्यानंतर काही तासांनंतर, तेलंगणा, हैदराबादच्या काँग्रेस अधिकृत प्रवक्त्या अस्मा यांनी रात्री सव्वा आठ वाजता हे सर्वेक्षण शेअर केले. याव्यतिरिक्त, उत्तर प्रदेश काँग्रेस सेवादलच्या अधिकृत ट्विटर अकाउंटने संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बनावट सर्वेक्षण शेअर केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा