जातीय जनगणनेच्या मुद्द्यावरून भाजप खासदार मनोज तिवारी यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधींवर जोरदार टीका केली. बुराडीमध्ये रविवारी बोलताना त्यांनी म्हटले की, जातीय जनगणना होऊ द्या, राहुल गांधींनाही आपली जात सांगावी लागेल. त्यानंतर सगळं उघड होईल. संपूर्ण दिल्ली आणि जगाला कळेल की ते कोणत्या जातीतले आहेत. तिवारी म्हणाले, “राहुल गांधी सनातन आणि हिंदूविरोधी आहेत, म्हणूनच ते हिंदू धर्माविरोधात विधाने करतात. त्यांना सनातन धर्मात आस्था नाही, ते केवळ ढोंग करतात. आता तर जातीय जनगणना होणार आहे आणि त्यांची जातही समोर येईल.
राहुल गांधींनी अमेरिकेतील ब्राउन विद्यापीठात भगवान श्रीराम काल्पनिक असल्याचे वक्तव्य केल्यावर तिवारी म्हणाले, “राहुल गांधींना त्यांची हिंदूविरोधी मानसिकता लखलाभ होवो. ते सनातन धर्माचे विरोधक आहेत आणि त्यांना हिंदू धर्माविषयी तिरस्कार आहे. आम्ही ज्या मार्गावर चाललो आहोत, त्या मार्गाने आम्ही प्रत्येक घरी रामचरितमानस पोहोचवू. तिवारी पुढे म्हणाले की, बुराडी परिसरात ‘मानव सेवा शिक्षण संस्था’च्या वतीने हस्तिनापूर शिव महापुराण कथा आयोजित केली जात आहे. शिव आणि राम यांची भावना प्रत्येक घरात पोहोचावी, म्हणून आम्ही संकल्प केला आहे की रामचरितमानस प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचं. आम्ही लोकांना आवाहन करत आहोत की २१ मे ते २७ मे दरम्यान बुराडीला यावे आणि शिव महापुराण कार्यक्रमात सहभागी होऊन पावन व्हावे.
हेही वाचा..
इम्रान खान, बिलावल भुट्टोच्या एक्स खाते भारतात ब्लॉक
‘आम्हाला भागीदार हवे आहेत, उपदेशक नव्हे
सिख नरसंहार : राहुल गांधींची माफी म्हणजे राजकीय ढोंग
पंजाब पोलिसांनी दोन हेरांना केली अटक
लक्षात घ्या की, केंद्र सरकारने नुकतेच देशात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ‘इंडिया आघाडी’तील काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर प्रादेशिक पक्ष या निर्णयाचा श्रेय स्वतःकडे घेत आहेत. श्रेय घेण्याच्या या स्पर्धेत भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की, “जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा त्यांना जातीय जनगणना का आठवली नाही? विरोधात असताना मात्र त्याची मागणी करतात.