‘राष्ट्र प्रथम’ ही भावना समोर ठेऊन भाजपा राष्ट्रहितासाठी सदैव तत्पर आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपा-महायुती सरकार कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे असे प्रतिपादन भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले.
आज (४ फेब्रुवारी) मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात इंडिगो एअरलाईन्सच्या २००० हून अधिक कर्मचाऱ्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला. याप्रसंगी पक्ष प्रवेश सोहळ्याला उपस्थित राहून भाजपा परिवारात सामील झालेल्या सर्व कर्मचारी बांधवांचे स्वागत केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेना उबाठा गटाचे संबंधित असलेल्या भारतीय कामगार सेनेचे संलग्न असलेल्या तर युनियन मध्ये कर्मचाऱ्यांनी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी विलेपार्ले विधानसभेचे आमदार पराग अळवणी, एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईजचे ऑल इंडिया अध्यक्ष नितीन जाधव, सरचिटणीस सुहास माटे, योगेश आवळे आदी उपस्थित होते.
हे ही वाचा :
मणिपूरमधून दहशतवादी संघटनांच्या सात सक्रिय सदस्यांना अटक
महाकुंभ चेंगराचेंगरी प्रकरण: अफवा पसरवणाऱ्या ८ जणांविरुद्ध एफआयआर!