राष्ट्रीय जनता दल (राजद) चे नेते आणि सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळाचे सदस्य प्रेम चंद गुप्ता यांनी गुरुवारी पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, “पाकिस्तान जेव्हापासून अस्तित्वात आला आहे, तेव्हापासूनच तो भारताविरुद्ध सातत्याने षडयंत्र करत आहे. त्यांनी सांगितले की, १९४८ मध्ये पाकिस्तानने मुजाहिदीन पाठवून जम्मू-काश्मीरच्या काही भागांवर ताबा मिळवला होता. त्यानंतरही त्यांनी १९६५, १९७१ आणि १९९९ मध्ये भारताविरुद्ध युद्ध छेडले.
पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबाबतही गुप्तांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, “भारतामध्ये आतापर्यंत ज्या-ज्या सरकारांनी सत्ता भूषवली, त्यांनी पाकिस्तानला केवळ एकच संदेश दिला, की तुम्ही दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवा, त्यांचे पालनपोषण थांबवा. मात्र, पाकिस्तानने याकडे आजवर काहीच लक्ष दिले नाही. ते पुढे म्हणाले की, “पाकिस्तान सातत्याने दहशतवाद्यांना संरक्षण देत आला आहे, परंतु आता ही स्थिती कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही.
हेही वाचा..
“दहशतवादी पाकिस्तानात असतील तर, जिथे असतील तिथेच मारू”
मसाला निर्यातीला चालना देण्यासाठी सरकारची योजना बघा
‘पातालगरुडी’: एक जादुई वनस्पती
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत गुप्तांनी पाकिस्तानवर टीका केली. त्यांनी म्हटले, “हे पाकिस्तानचे अमानवीय कृत्य होते, ज्यामध्ये त्यांनी पर्यटकांनाच लक्ष्य केले. तरीसुद्धा पाकिस्तान आपली चूक मान्य करत नाही. त्यामुळेच भारताला ‘ऑपरेशन सिंदूर’ सारखा निर्णय घ्यावा लागला, ज्याचे परिणाम आता स्पष्टपणे दिसून येत आहेत. याशिवाय, गुप्तांनी वेगवेगळ्या देशांमध्ये भारत सरकारकडून पाठवण्यात येणाऱ्या सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळाच्या उद्देशाबाबतही माहिती दिली. त्यांनी सांगितले, “आम्ही हे प्रतिनिधीमंडळ पाठवून जागतिक मंचावर पाकिस्तानचा खरा चेहरा उघड करणार आहोत. आम्ही संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की पाकिस्तान कसा दहशतवाद्यांना आश्रय देतो, त्यांचे संगोपन करतो.
गुप्तांनी पाकिस्तानला “खोटारडा आणि नकल करणारा देश” ठरवत म्हटले की, “पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर विश्वसनीयता नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात राहिली आहे. त्यांच्याकडे स्वतःचं काहीही मौलिक नाही; ते इतर देशांची फक्त नक्कल करत राहतात. ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे कौतुक करताना त्यांनी म्हटले, “या ऑपरेशनमुळे दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळाले आहे. हे ऑपरेशन यशस्वी करण्यात आपल्या सैन्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि आम्हाला आपल्या सैन्यावर संपूर्ण विश्वास आहे.
