सीमेपलीकडे दहशतवादी छावण्यांवर भारताने केलेल्या अचूक हल्ल्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा सुरु बदलल्याचे दिसून येत आहे. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारतासोबतचा तणाव कमी करण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे भारताला धमकी देणारे नेते आता नरम पडले आहेत का?, अशी चर्चा होत आहे.
भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याच्या काही तासांनंतरच ख्वाजा आसिफ यांचे विधान समोर आले आहे. ब्लूमबर्ग टीव्हीशी बोलताना आसिफ म्हणाले की, जर भारताने शांततेची भूमिका घेतली तर पाकिस्तान तणाव संपवण्यास तयार आहे. पाकिस्तानवर हल्ला झाला तरच तो प्रत्युत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.
आसिफ पुढे म्हणाले, “आम्ही गेल्या पंधरवड्यापासून सतत सांगत आहोत की आम्ही कधीही भारताविरुद्ध कोणतीही शत्रुत्वाची कारवाई करणार नाही. पण जर आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही प्रत्युत्तर देऊ. जर भारताने मवाळ भूमिका घेतली तर आम्ही निश्चितच हा तणाव संपवू.”
हे ही वाचा :
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये १५ नक्षलवाद्यांचा खात्मा!
‘ऑपरेशन सिंदूर’: दहशतवादी मसूद अझहर म्हणाला, मीही मेलो असतो तर बरे झाले असते!
भारताच्या लष्करी हल्ल्यांबद्दल चीन चिंतेत, म्हणाला ‘खेदजनक’
ऑपरेशन सिंदूर: दहशतवादाचा तळ नष्ट करण्यासाठी भारताने दिलेली प्रतिक्रिया; काय म्हणाले परराष्ट्र सचिव
दरम्यान, भारताने पाकिस्तानविरुद्ध राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये जैशचे अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. यामध्ये १०० हून दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात जैशचा दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबातील १० सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्याचे चार जवळचे सहकारीही देखील मृत्युमुखी पडले. मसूद अझहरने एक निवेदन जारी करून याची पुष्टी केली आहे. या हल्ल्यात मीही मेलो असतो तर बरे झाले असते, असे त्याने म्हटले आहे.