27.8 C
Mumbai
Saturday, April 19, 2025
घरविशेषरामलल्लांचे सूर्य तिलक हे पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेचे फळ

रामलल्लांचे सूर्य तिलक हे पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेचे फळ

Google News Follow

Related

रामनवमीच्या दिवशी श्रीरामलल्लांच्या कपाळावर सूर्यकिरणांद्वारे झालेले ‘सूर्य तिलक’ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेचे प्रतिफळ आहे, अशी माहिती राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिली. त्यांनी सूर्यकिरणांनी रामलल्लांना तिलक करण्याच्या अनोख्या व्यवस्थेपासून ते परिघात आणि मुख्य मंदिरातील राम दरबाराच्या मूर्तींच्या स्थापनेपर्यंतचे सविस्तर तपशील उघड केले.

चंपत राय यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणांनी रामलल्लांच्या कपाळावर तिलक होण्याची कल्पना तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली होती. त्यानंतर वैज्ञानिकांनी यावर काम सुरू केले आणि आता ही योजना स्थायीरूपात कार्यान्वित झाली आहे. ही तंत्रज्ञान-आधारित व्यवस्था केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर वैज्ञानिक कौशल्याचेही दर्शन घडवते.

हेही वाचा..

भारताला फ्रान्सकडून २६ राफेल मरीन जेट्स मिळणार!

हिंदूंवरील आक्षेपार्ह विधानानंतर भाजपा- आप आमदारांमध्ये हाणामारी

ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरवर भारताची रणनीती ठरली! काय म्हणाले एस जयशंकर?

रेल्वेच्या डब्यात विनातिकीट बुरखाधारी महिलेचा थयथयाट, प्रवाशाला तुकडे करण्याची धमकी

मंदिर बांधकामाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्देही त्यांनी शेअर केले. परकोट्यात सध्या सहा मंदिरांचे बांधकाम वेगात सुरू आहे. या मंदिरांमध्ये शेषावतार, लक्ष्मणजी, अगस्त ऋषी, निषादराज, अहिल्या आणि शबरी यांच्या मूर्तींचा समावेश आहे. या मूर्ती जवळपास तयार असून त्यांचे सजावटकाम अंतिम टप्प्यात आहे. परकोटा आणि मुख्य मंदिरात जी राम दरबाराची मूर्ती बसवली जाणार आहे ती शुभ्र मकराना संगमरवरात तयार केली जात आहे.

या मूर्ती १५ एप्रिलनंतर जयपूरहून अयोध्येला आणण्याची प्रक्रिया सुरू होईल. १८ मूर्ती ३० एप्रिल रोजी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर मंदिरांमध्ये प्रतिष्ठापित केल्या जातील. त्यानंतर जून महिन्यात तीन दिवसीय प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित केला जाणार असून मुख्य मंदिरातील राम दरबार आणि परकोट्यातील सप्त मंदिरांतील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा होईल.

चंपत राय यांनी सांगितले की, मंदिराच्या शिखराचे पूजन पूर्ण झाले असून शिखरावर बसवले जाणारे ध्वजदंड अयोध्येत पोहोचले आहेत. हे ध्वजदंड मजबूत आणि आकर्षक असून सामूहिक पूजनानंतर ते शिखरावर स्थापित केले जातील. राम मंदिराचे चार मुख्य दरवाजे असतील, ते हिंदू धर्माच्या चार परंपरांवर आधारित असतील. हे दरवाजे महान संतांच्या नावावर असतील. मंदिर परिसरात आणखी तीन मूर्तींची स्थापना होणार असून त्यात संत त्यागराज, पुरंदरदास यांच्या मूर्तींचा समावेश असेल. तिसऱ्या मूर्तीबाबत चर्चा सुरू आहे. यासोबतच रामायणात प्रभू रामाच्या सेवेत समर्पित असलेल्या गिलहरीची एक मूर्ती मंदिर परिसरात अशा ठिकाणी स्थापित केली जाईल, जिथे भक्त तिच्यासोबत फोटो काढू शकतील.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
243,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा