योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे की, मध्य प्रदेश सरकार वारसा आधारित विकास आणि संस्कृती आधारित समृद्धीचे नवे प्रतिमान प्रस्थापित करत आहे. उज्जैनच्या दौऱ्यावर आलेल्या बाबा रामदेव यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांची भेट घेतली आणि विविध मुद्द्यांवर चर्चा केली. माध्यमांशी बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, “मध्य प्रदेश हे असे राज्य आहे जिथे विकासप्रधान कार्य आणि संस्कृतीप्रधान समृद्धीचे प्रतिमान मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वात घडत आहेत. मध्य प्रदेश ही धर्मभूमी आहे. इथे कृषीपासून ते उद्योग क्षेत्रात सतत प्रगती होत आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक क्षेत्रातही अनेक कामं सुरू आहेत.
उज्जैनच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचा उल्लेख करत बाबा रामदेव म्हणाले, “महाकाल देवांमध्ये श्रेष्ठ आहेत, त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचे हे एक प्रमुख केंद्र आहे. उज्जैन ही एक प्रकारे अध्यात्मिक राजधानी आहे आणि सतत विकसित होत आहे. राज्य सरकार नवीन विचारसरणीने पुढे जात आहे. साल २०२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थाच्या आयोजनाबाबत, बाबा रामदेव म्हणाले, “२०२८ मध्ये सिंहस्थ होणार आहे आणि हा महोत्सवही तेवढाच यशस्वी व्हावा, जेणेकरून सनातन धर्माचा गौरव एका नव्या स्वरूपात संपूर्ण देश व जगासमोर उभा राहील, हीच अपेक्षा आहे.
हेही वाचा..
फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट
इंडी आघाडी नाहीतर ही रावळपिंडी आघाडी आहे!
दादागिरी करणाऱ्यांना धडा शिकवा
खास मैत्रिणी’सोबत समुद्रकिनारी फिरताना दिसल्या मनीषा कोईराला
बाबा रामदेव यांनी पुढे सांगितले की, “मुख्यमंत्री पूर्ण सात्विकता आणि निरहंकाराने काम करत आहेत. शास्त्रात म्हटलं आहे, की शासकामध्ये वीरता आणि विनय यांचा संगम असावा – हे इथे स्पष्टपणे दिसून येते. कोट्यवधी लोकांच्या अपेक्षांची पूर्ती म्हणून हे कार्य होणार आहे. यासाठी माझ्या शुभेच्छा. योगगुरु रामदेव यांच्या सिंहस्थ २०२८ संदर्भातील विधानावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले, “योगगुरु रामदेव यांनी सिंहस्थ २०२८ च्या तयारीसंदर्भात आमचं उत्साहवर्धन केलं आणि सनातन धर्माच्या या जागतिक स्तरावरील भव्य आयोजनाच्या यशासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी हृदयपूर्वक आभार मानतो.