29.5 C
Mumbai
Tuesday, May 20, 2025
घरसंपादकीय‘पाकवर हल्ला कधी होणार’ या प्रश्नामागचा अर्थ समजून घ्या...

‘पाकवर हल्ला कधी होणार’ या प्रश्नामागचा अर्थ समजून घ्या…

विरोधकांचे हास्यास्पद दावे

Google News Follow

Related

पहलगामचा दहशतवादी हल्ला २२ एप्रिल रोजी झाला. त्यानंतर आज १३ दिवस उलटले आहेत. काँग्रेस आणि इंडी आघाडीचे तमाम नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवत एकच सवाल करतायत. हल्ला कधी होणार? शब्द वेगळे
असतील, विधाने वेगवेगळी असतील, परंतु आशय एकच, हल्ल्याचा मुहूर्त कोणता? या विधानांचा अर्थ समजून घेण्यासाठी थोडे मागे जावे लागेल. काही घटना समजून घ्याव्या लागतील. हा प्रश्न नेमका कोणासाठी विचारला जातो आहे, हेही लक्षात घ्यावे लागेल.

पाकिस्तानवर हल्ला कधी होणार? याबाबत विरोधकांची उत्कंठा खूपच ताणली आहे. देशात काहीही बरे वाईट घडले की वाचाळपणाचे प्रदर्शन करायचे आणि त्यानिमित्ताने आपला मेंदू किती गुढग्यात आहे, हे दाखवून द्यायचे हे विरोधकांचे
रोजचेचे झालेले आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणतायत, पाणी आणि यूट्युबच बंद करायचे होते तर ५०० कोटीची राफेल १५०० कोटींना घेऊन फक्त लिंबू मिर्ची बांधायला ठेवलेंय का? एक्सवर त्यांनी हा ट्वीट केला आहे. या म्हणे एड्वोकेट आहेत. खरे तर यांच्या मेंदूला लिंबू-मिर्ची बांधावी इतका हा दुर्मिळ आहे. यांच्या मालकाने म्हणजे राहुल गांधी यांनी राफेलप्रकरणी असेच बिनडोक आरोप करून अखेर सर्वोच्च न्यायालया बिनशर्त माफी मागितली होती. काँग्रेस पक्षात बेशरमपणा असा वरून झिरपत झिरपत खाली येतो.

पाकिस्तानशी भारताची तीन युद्ध काँग्रेसच्या सत्ताकाळात झाली, त्या काळात सिंधू जल करार स्थगित करण्याचे धाडस काँग्रेसला झाले नाही. ते पाऊल मोदींनी उचलले. युद्धाने होणार नाही, अशी जखम पाकिस्तानला झालेली आहे.
बिलावल भुत्तोपासून ख्वाजा आसिफ यांच्यापर्यंत सगळे नेते अक्षरश: विव्हळले आहेत. या मुद्द्यावर भारताला धमकावून मोकळे झालेले आहेत. परंतु प्रत्यक्षात काही करण्याची हिंमत त्यांना झालेली नाही. मोदींनी किती मोठा झटका
पाकिस्तानला दिला आहे, हे समजून घेण्याची कुवत जिथे काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला नाही तिथे ठाकूर वगैरे अगदीच किरकोळ आहेत. यांनी राजकीय विधाने करण्यापेक्षा पोगो पाहावा त्यातच त्यांचे आणि देशाचे भले आहे.

काँग्रेसमध्ये अशा मूर्खांची अजिबात कमतरता नाही. एक धुंडो हजार मिल जाते है, अशी परिस्थिती. अजय राय हे आणखी एक काँग्रेस नेते. खेळण्यातल्या एका विमानाला राफेलचे नाव देऊन त्याला लिंबू मिर्ची बांधण्याचा आचरटपणा त्यांनीही केला. सर्वोच्च पदावर बसलेला अर्धवट असेल तर खाली तशीच अर्धवटांची फौज उभी राहते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काँग्रेस. उरीमध्ये १८ सप्टेंबर २०१६ मध्ये दहशतवादी हल्ला झाला. त्याचा वचपा आणि दहा दिवसांनी सर्जिकल स्ट्राईककरून २८ सप्टेंबर रोजी घेण्यात आला. पुलवामा हल्ला १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झाला. त्याचे उत्तर म्हणून आपण बालाकोट हवाई हल्ला केला २६ फेब्रुवारी रोजी. म्हणजे पहिल्या हल्ल्यानंतर १० दिवस आणि दुसऱ्या हल्ल्यानंतर १२ दिवस आपण तयारी केली आणि नंतर हल्ला केला.

दोन देशांमध्ये जेव्हा तणाव निर्माण होतो, तेव्हा ती रस्त्यावर होणारी गुंडापुंडांची हाणामारी नसते. प्रत्येक आतंरराष्ट्रीय घटनेचे जगावर परीणाम होत असतात, म्हणून छोट्याछोट्या संघर्षाबाबत जग सतर्क असते. लढाई करताना ती फक्त
लढण्यासाठी करायची नसते तर जिंकण्यासाठी करायची असते. उरी आणि बालाकोट किरकोळ वाटेल अशी थप्पड पाकिस्तानला लगावण्याची तयारी भारताने सुरू केलेली आहे. परंतु इतिहास लक्षात न घेता, फक्त बडबड करण्याची
शर्यत काँग्रेस नेत्यांमध्ये लागलेली आहे. ही बडबड निरर्थकच असेल असे समजायचे काही कारण नाही. आसामचे
मुख्यमंत्री हिमंता बिस्वसर्मा यांनी काही दिवसांपूर्वी गौरव गोगोई यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते. भारताच्या सामरीक तयारीबाबत अत्यंत संवेदनशील प्रश्न गौरव गोगोई सतत संसदेत उपस्थित करत असतात, याकडे

त्यांनी देशाचे लक्ष वेधले. तटरक्षक दलाची रडार यंत्रणा, त्यांचे तंत्रज्ञान, किंमत, भारतातील शस्त्रनिर्मिती कऱणाऱ्या कंपन्या, हवाई सुरक्षा, भारत इराण व्यापारी मार्ग, असे सवाल गौरव गोगोई नियमितपणे विचारत असत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही फ्रान्सकडून आयात केलेल्या राफेलची किंमत पाचशे कोटीवरून सोळाशे कोटी कशी झाली? असा प्रश्न राहुलना पडला होता. कार खरेदी केल्यानंतर रस्त्यावर येईपर्यंत कारची किंमतही वाढते, हे सर्वसामान्यांनाही ठाऊक असते. बऱ्याच एक्सेसरीज, फिटिंग्जची त्यात भर पडत असते. मग लढाऊ विमान तसेच येईल का? वाढलेला ११०० कोटींचा खर्च
राफेलवर जी रडार आणि सॉफ्टवेअर लागतात त्यासाठी होता. बहुधा राहुल गांधी यांना हा तपशील जाहीर व्हावा, अशा प्रयत्नात होते. ही माहिती शत्रूसाठी खूप महत्वाची असते. उपयुक्त असते. ही माहिती खणून काढण्यासाठी शत्रू देश
ह्युमन इंटेलिजन्सवर प्रचंड पैसा खर्च करत असतो. ही माहिती किती महत्वाची असते हे लक्षात घ्या.

हे ही वाचा:

पाकिस्तानला निसर्गाचाही झटका, भूकंपाचे धक्के

आसाम: भारतविरोधी टिप्पण्या, आमदारासह ४२ जणांना अटक!

पाणीभरावावर नियंत्रणासाठी ‘एकत्रित कमांड सेंटर’

पुतिन यांचा पंतप्रधान मोदींना फोन, काय म्हणाले ?

पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर माहिती प्रसारण मंत्रालयाने लष्कराच्या हालचालींच्या माहितीचे कव्हरेज करू नका, असा सक्त आदेश मीडिया दिला. मोदी सरकारने इतिहासावरून घेतलेला हा धडा होता. कारण २६/११ चा हल्ला
असो वा कारगिल युद्ध सुरक्षा दलांच्या हालचालींची माहिती पत्रकारांच्या अतिउत्साही पणामुळे पाकिस्तानला मिळाली. कारगिल युद्धाच्या काळात तर अशा माहितीमुळे जवानांचे बळी गेले. बरखा दत्त यांचा हा कारनामा आजही
चर्चिला जातो. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला कधी होणार? कसा होणार? आपली रणनीती काय असेल? आपल्याकडे पुरेसा शस्त्र पुरवठा आहे का? आपले शक्तीस्थळ किंवा कमजोरी काय असेल? हे सगळे पाकिस्तानला पडलेले प्रश्न आहेत. त्याचे कारण स्पष्ट आहे. उद्या काय होणार हे कोणालाच माहित नाही. धक्कातंत्र हा मोदी यांच्या निर्णय प्रक्रियेतील सगळ्यात प्रभावी बिंदू असतो. उरी नंतर सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला. परंतु पुलवामाच्या वेळी हवाई हल्ला करण्यात आला.

 

एकदा वापरलेली रणनीती पुन्हा वापरायची नाही, हे मोदींचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांच्या मनाचा अंदाज ना त्यांच्या शत्रूला येत ना विरोधकांना. काँग्रेस पक्षाचे पाकिस्तान प्रेम सगळ्यांना ठाऊक आहे. मणिशंकर अय्यर यांच्यासारखे बरेच नेते काँग्रेसमध्ये आहेत. त्यांना मोदींची रणनीती उघड करण्याची घाई झालेली आहे. मनाचा ठाव लागू न देणे ही मोदींची सगळ्यात मोठी ताकद आहे. त्यामुळेच पाकिस्तानचे प्राण कंठाशी आले आहेत. मोदी हल्ला करणार की नाही, हा प्रश्न फक्त काँग्रेसवाल्यांना पडलेला आहे. पाकिस्तानच्या मनातही ही शंका नाही. देशाची जनताही आश्वस्त आहे.
मोदी सरकार राफेलला लिंबू मिर्ची बांधणार की त्यावर ब्रह्मोस सज्ज करणार हे कळायला फार काळ थांबावे लागणार नाही. घोडा मैदान जवळ आहे.

२९ एप्रिलच्या पहाटे दोन वाजता पाकिस्तानचा माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरार याने भारत २४ ते ३६ तासांत हल्ला करणार अशी भविष्यवाणी केली होती. ती खोटी ठरली. हल्ल्याच्या भीतीने झोप उडालेल्या अवस्थेत पाकिस्तानी नेत्यांचे प्राण कंठाशी आलेले आहेत. जेव्हा हल्ला कधी हा विचार करून करून त्यांना, इथल्या तिथल्या मीडियाला धाप लागेल तेव्हा मोदी हल्ला करतील. युद्धभूमी कोणती असेल, हल्ल्याची वेळ कोणती असेल हे तेच ठरवतील. तीच भारताच्या विजयाची चावी असेल.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
249,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा