27.5 C
Mumbai
Friday, July 11, 2025
घरदेश दुनियाभारताचे ऑपरेशन 'सिंधू', पाकिस्तानच्या घशाला कोरड!

भारताचे ऑपरेशन ‘सिंधू’, पाकिस्तानच्या घशाला कोरड!

भारताने सिंधू करार स्थगित करून एका कराराचा शेवट करत एक युग संपवले

Google News Follow

Related

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तान विरोधात निर्णायक पावले उचलताना ‘सिंधू नदी पाणीवाटप करार’ तात्पुरता स्थगित केला. यानंतर आता सिंधू व चिनाब नद्यांचे पाणी थेट राजस्थानमध्ये वळवण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत यामुळे पाकिस्तानला आणखी एक दणका बसणार आहे. भारताने आधीच झेलम, चिनाब आणि सिंधू या तीन प्रमुख पश्चिम वाहिनी नद्यांचे प्रवाह रोखण्याच्या दिशेने कार्यवाही सुरू केली असून, यामुळे पाकिस्तानमध्ये जल आवक कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, काही छद्मी भारतविरोधी गटांनी “भारताला हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही” अशा चर्चा पेरण्याचा प्रयत्न केला होता. पण आता केंद्र सरकारने राजस्थानच्या थार वाळवंटाला सिंचनासाठी सिंधू व चिनाब नद्यांचे पाणी आणण्याचा स्पष्ट निर्धार व्यक्त केला आहे. या दिशेने चिनाब-रावी-बियास-सतलज जोड कालवा प्रकल्पासाठी पूर्व-व्यवहार्यता अभ्यास सुरू करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी भारतात वापरणे अधिक प्रमाणात शक्य होणार असून, पाकिस्तानच्या पाण्यावरच्या अवलंबनाला मोठा धक्का बसणार आहे.
भारताची दिलदारी: सिंधू करार
१९६० साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीखाली, भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिंधू जलवाटप करार झाला. या करारानुसार, सिंधू नदी प्रणालीतील सहा प्रमुख नद्यांपैकी पूर्वेकडच्या रावी, बियास, सतलज नद्यांवरील अधिकार भारताला, तर पश्चिमेकडच्या सिंधू, झेलम, चिनाब नद्यांवरील अधिकार पाकिस्तानला देण्यात आला. भारताने अत्यंत जबाबदारीने आणि शांततेच्या हेतूने, सहा दशकांहून अधिक काळ या कराराचा पूर्ण मान राखला.तथापि, स्वातंत्र्यानंतरच्या ६५ वर्षाच्या काळात जिहादी पाकिस्तानने भारतविरोधी कारवाया सुरूच ठेवल्या. दहशतवाद्यांना सक्रिय मदत करणे, भारतातील कारवायांना रसद पुरवणे, जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता पसरवण्यासाठी दहशतवादी कारवाया करणे, सीमा अशांत ठेवणे याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताविरोधात आगपाखड करणे, हाच पाकिस्तानचा एककलमी कार्यक्रम राहिला. खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, अशा शब्दांत त्यांनी पाकिस्तानला वेळोवेळी इशारा दिला. तथापि, २०१९ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देखील पंतप्रधान मोदी यांनी सिंधू करार स्थगित केला नव्हता. मात्र, पहलगाम हल्ल्याने भारतीयांचा संयमाचा बांध मोडला आहे.
हे ही वाचा:

अमित शहांचा पुणे दौरा, पिस्तुल-जिवंत काडतुसासह एकाला अटक!

भाजपला पहिली महिला अध्यक्ष मिळणार?

नवीन फौजदारी कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश!

मराठी बोलावीच लागेल पण मारहाण चुकीची!

भारत बांधणार २०० किमी लांब कालवा आणि १२ जोडणी कालव्यांचे जाळे

आगामी तीन वर्षांत सिंधू नदीचे पाणी कालव्याच्या माध्यमातून राजस्थानच्या श्रीगंगानगरपर्यंत आणण्याची योजना आहे. त्यामुळे राजस्थानचा मोठा भूभाग सिंचनाखाली येईल. येथील शेतकर्‍यांना पाणी संकटाचा सामना करावा लागणार नाही. दुसरीकडे धर्मांध जिहादी पाकिस्तानला मात्र मोठा फटका बसणार आहे.

भारताच्या या योजनेअंतर्गत २०० किमी लांब कालवा आणि १२ जोडणी कालवे निर्माण करण्यात येतील. त्यामधून पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी राजस्थानमध्ये आणून खेळवण्यात येईल. मरुभूमीचे नंदनवनात रूपांतर करणाऱ्या या प्रकल्पात प्रशासकीय अडचणी येऊ नयेत, यासाठी सिंधू नदी खोर्‍यातील सर्वच नद्यांच्या पाण्याविषयीच्या योजनांना मंजुरी देखील देण्यात आली आहे. हा निर्णय केवळ सिंचन प्रकल्प नाही, तर तो राजकीयदृष्ट्या पाकिस्तानवर दबाव टाकण्याच्या प्रयत्न मानला जात आहे.

वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेला कठुआ जिल्ह्यातील उझ (उझ ही रावीची उपनदी) बहुउद्देशीय प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आला आहे. या भागात बांधकाम करणे खर्चिक असल्याने तसेच राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे काँग्रेसच्या काळात फक्त भूमिपूजनच होत असे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून या परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे.

रावीचे अतिरिक्त पाणी पाकिस्तानात जाण्यापासून रोखण्यासाठी रावी-बियास लिंक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आधीच सुरुवात झाली आहे. बगलिहार येथील जलाशयांमधून गाळ काढणे, चिनाबवरील सलाल जलविद्युत प्रकल्प यांसारखे मोठे प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत. भारत सिंधू नदी प्रणालीच्या पाण्याचा पुरेपूर वापर करण्यासाठी अनेक जलविद्युत प्रकल्पांचे काम देखील वेगवान करत आहे. त्यात प्रामुख्याने पाकल दुल (१००० MW), रतळ (८५० MW), किरु (६२४ MW), आणि क्वार (५४० MW) यांचा समावेश आहे.

कपटी पाकिस्तानच्या कुरापती विचारात घेऊन, भारताने सिंधू जलवाटप करारावर फेरविचार सुरू केला. गेल्या काही वर्षांत बागलीहार धरण, किशनगंगा प्रकल्प यांसारखे पायाभूत प्रकल्प उभारले गेले. पाकिस्तानने या प्रकल्पांवर आक्षेप घेतले. तथापि, भारताने जागतिक निकष पाळले असल्यामुळे, ते आक्षेप टिकले नाहीत.

सिंधू करार स्थगित केल्यामुळे, पाकिस्तानच्या कृषी अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसणार आहे. पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान या भागांतील शेती पूर्णतः सिंधू नदी प्रणालीवर अवलंबून असून, सिंचनासाठी पाणी न मिळाल्यास, तर अन्नधान्य उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे.

भारताचा निर्णायक प्रहार

सिंधू करार स्थगित करण्याच्या भारताच्या या निर्णयाचे सामरिक आणि आर्थिक दोन्ही परिणाम होतील. पाकिस्तानने त्याच्या महसुलाचा मोठा भाग दहशतवादी संघटनांना मोठे करण्यासाठीच वापरला, याचे पुरावे यापूर्वी अनेकदा समोर आले आहेत. त्यामुळे, व्यापार थांबवून आणि सिंधू पाणी करार स्थगित करून भारताने पाकिस्तानवर केवळ आर्थिक प्रहार केला असे नव्हे, तर राष्ट्रीय सुरक्षेचे हितही जोपासले आहे. तसेच, या निर्णयामुळे जागतिक पातळीवर भारताने आता भारताचा संयम संपला आहे असा ठोस संदेश दिला आहे. सिंधू जलवाटप करार स्थगित केल्यानंतर, भारताने त्या नद्यांचे पाणी अडवण्यास सुरुवात केल्यावर, पाकिस्तानला आवश्यक त्या पाण्याचा तुटवडा जाणवणार आहेच, त्याशिवाय कंगाल झालेल्या पाकिस्तानचे कंबरडेही आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे मोडणार आहे.

भारताने सिंधू करार स्थगित करून केवळ एका कराराचा शेवट केला नाही, तर एक युग संपवले आहे. हे राष्ट्रहिताचे पाऊल असून, पाकिस्तानच्या दहशतवादी उद्योगाला आर्थिक रसद पुरवण्याच्या यंत्रणाच यातून बंद केल्या आहेत. भारत संयमी असला, तरी प्रसंगी तो निर्णायक वारही करतो हेच यातून अधोरेखित झाले आहे. भारताची संरक्षण नीती, जलनीती आणि सामरिक नीती यामध्ये जलस्रोत हा महत्त्वाचा घटक ठरला असून, पाकिस्तानने युद्धाला तोंड फोडलेच, तर युद्धभूमीवरील रणगाड्यांपेक्षा जलवाहिन्याच महत्त्वाच्या ठरतील, हे भारताने ओळखले असल्याचे हे द्योतक आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा