33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारण'मराठी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला आपुलकी नाही', गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल

‘मराठी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला आपुलकी नाही’, गोपीचंद पडळकर यांचा हल्लाबोल

Google News Follow

Related

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर आलेल्या आर्थिक कोंडीच्या संकटाला कंटाळून त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संप पुकारला आहे. सरकारने काही मागण्या पूर्ण केल्या असल्या तरी एसटीचे सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी अजूनही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. शांततेत सुरू असणाऱ्या आंदोलनाला सरकारकडून दाबण्याचा प्रयत्न केले जात असल्याचे भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. आंदोलनासाठी मुंबईत दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांना रोखण्यात आल्याने पडळकरांनी सरकारवर आणि अनिल परबांवर टीकेची तोफ डागली आहे.

‘ठाकरे सरकारचा खरा चेहरा उघडा झाला आहे व मराठी एसटी कर्मचाऱ्यांविषयी त्यांना कुठलीही आपुलकी नाही, हे त्यांच्या कृत्यातून सिद्ध झाले आहे, असे गोपीचंद पडळकरांनी म्हटले आहे. ‘एखादा व्यक्ती जेव्हा हतबलतेमुळे आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलतो त्यावेळेस त्याच्यावर बिकट परिस्थिती असते. अशा वेळेस त्याला धीर देऊन आत्महत्येच्या विचारातून बाहेर काढायचे असते, पण यांनी कालपासून एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करणे, अवमान याचिका दाखल करण्याची मिडीयाच्या माध्यमातून धमकी देणे तसेच जागोजागी व गावोगावी पोलिसबळाचा वापर करून मंत्रालयाच्या दिशेने निघालेल्या कर्मचाऱ्यांना रोखलं जात आहे. यावरून हेच सिद्ध होते की शांततेत लोकशाही मार्गाने चालू असलेल्या आंदोलनात अनिल परबांना उद्रेक घडवायचा आहे, असे पडळकरांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

अहमदनगर रुग्णालय आग प्रकरणात चार जण अटकेत

नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? हर्षदा रेडकर यांची पोलीस तक्रार

९६ देश टोचणार कोव्हीशिल्ड, कोव्हॅक्सिन

न्यूझीलंड सोबतच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

उद्रेक झाल्यामुळे पोलीसांच्या लाठ्या- काठ्यांचा वापर हतबल कर्मचाऱ्यांवर करण्याची मोकळीकच अनिल परबांना मिळेल. तसेच यांच्या निजामशाहीमुळे जर कुठल्या कर्मचाऱ्याने हतबल होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तर याची सर्वस्वी जबाबदारी ठाकरे सरकारची राहिल, असे पडळकरांनी म्हटले आहे. ‘मला संपूर्ण महाराष्ट्राला आवाहन करायचे की, तुमच्या सुखा- दुःखात साथ देणाऱ्या लालपरीचे कर्मचारी आज आत्महत्येच्या दारात आहेत. आज त्यांना तुमच्या मदतीची, धीराची, आपुलकीची गरज आहे, कारण एसटी कर्मचारी जगतील तरच महाराष्ट्राची लालपरी जगेल, असे आवाहन देखील पडळकरांनी केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा