आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था (IAEA) चे महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी इराणमधील अणुऊर्जा सुविधांवर इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे अणुऊर्जा प्रदूषण (रेडिओधर्मी आणि रासायनिक) निर्माण होण्याचा गंभीर इशारा दिला आहे. ग्रॉसी म्हणाले, “इराणमधील अणुऊर्जा स्थळांवरील हल्ल्यांमुळे तिथल्या अणुउर्जा सुरक्षा आणि संरक्षक व्यवस्थेत मोठी घट झाली आहे. सध्या तरी कोणतेही सार्वजनिक रेडिओधर्मी उत्सर्जन आढळलेले नाही, मात्र त्याचा धोका कायम आहे.
सिन्हुआ वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीत ब्रिफिंग देताना ग्रॉसी यांनी सांगितले की, इस्रायली हल्ल्यानंतर नतांज साइटच्या बाहेरील रेडिओधर्मिता पातळी सध्या स्थिर आणि सामान्य आहे. मात्र प्रकल्पाच्या आतील भागात रेडिओधर्मी आणि रासायनिक प्रदूषणाचे स्पष्ट चिन्ह आहे. ते पुढे म्हणाले, “मुख्यतः अल्फा कण असलेले विकिरण जर श्वासाद्वारे शरीरात गेले किंवा गिळले गेले, तर ते मोठा धोका निर्माण करते. योग्य सुरक्षा उपाय – जसे की श्वसन यंत्रांचा वापर – केल्यास हा धोका नियंत्रित केला जाऊ शकतो. प्रकल्पाच्या आतील मुख्य चिंता ही रासायनिक विषारीपणाबाबत आहे.
हेही वाचा..
भारतातील कृषी, ग्रामीण कामगारांसाठी महागाईत घट
इराणवर हल्ले थांबवण्यास इस्रायलला सांगणे कठीण
योग दिन : राष्ट्रपतींचाही सहभाग
उपवन पवन जैन अखेर भारताच्या ताब्यात
फोर्डो हे ६० टक्के युरेनियम समृद्ध करण्याचे इराणचे प्रमुख केंद्र असून, ग्रॉसी म्हणाले की सध्या IAEA ला फोर्डोमध्ये कोणतीही हानी झाल्याचे संकेत नाहीत. १३ जून रोजी इस्फहान अणुऊर्जा प्रकल्पावर झालेल्या हल्ल्यात चार इमारतींचे नुकसान झाले. मात्र, प्रकल्पाबाहेरील रेडिओधर्मिता पातळीत कोणताही वाढीव बदल आढळला नाही. त्यांनी स्पष्ट केले की, नतांजप्रमाणेच येथेही मुख्य चिंता ही रासायनिक विषारीपणाबद्दल आहे.
ग्रॉसी म्हणाले की, अन्य अणुऊर्जा स्थळांवरील हल्ल्यांमुळे रेडिओधर्मी परिणाम झालेले नाहीत. IAEA प्रमुखांनी बुशहर अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा दिला आहे. हा प्रकल्प कार्यरत आहे आणि त्यामध्ये हजारो किलोग्रॅम अणु साहित्य साठवलेले आहे. ते म्हणाले, “मी हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की – बुशहर अणुऊर्जा प्रकल्पावर थेट हल्ला झाल्यास, पर्यावरणात मोठ्या प्रमाणात रेडिओधर्मी उत्सर्जन होऊ शकते.
त्याचप्रमाणे, प्रकल्पाला वीज पुरवणाऱ्या दोनच ओळी जर निष्क्रिय झाल्या, तर रिएक्टरचे कोअर वितळण्याची शक्यता निर्माण होते, आणि त्यामुळेही पर्यावरणात प्रचंड प्रमाणात विकिरण होऊ शकते. अशा परिस्थितींमध्ये लोकांचे स्थलांतर, आश्रय स्थळांची उभारणी, आणि काही किलोमीटर ते शेकडो किलोमीटरपर्यंतच्या क्षेत्रात ‘स्थिर आयोडीन’ देण्याची गरज भासू शकते. ग्रॉसी यांनी चेतावणी दिली की, विकिरण पातळीचे निरीक्षण मोठ्या भूभागावर करावे लागेल आणि अन्नावर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते.
तेहरान अणु संशोधन रिऍक्टरवर कोणतीही कारवाई झाल्यास त्याचे परिणाम संपूर्ण शहर आणि मोठ्या लोकवस्तीवर होऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, “अणुऊर्जा प्रकल्पांवर सशस्त्र हल्ले कधीही होऊ नयेत. सर्वांनी कमाल संयम बाळगणे आवश्यक आहे. ग्रॉसी म्हणाले की, अशा सैन्यत्मक चढाओढींमुळे सामान्य जीवन धोक्यात येते आणि इराणकडून अण्वस्त्र मिळवण्याच्या शक्यतेबाबत दीर्घकालीन विश्वास निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले कूटनीतिक प्रयत्न खोळंबतात.
“जर राजकीय इच्छाशक्ती असेल, तर कूटनीतिक तोडगा शक्य आहे. अनेक मुद्द्यांवर आधीच चर्चा झाली आहे. IAEA अशी निरीक्षण प्रणाली तयार करू शकते जी खात्री देऊ शकेल की इराणमध्ये अण्वस्त्र विकसित होणार नाहीत. हे एक दीर्घकालीन कराराचे अधिष्ठान बनू शकते, जे शांतता प्रस्थापित करेल आणि मध्यपूर्वेतील अणु संघर्ष टाळेल. या संधीला वाया जाऊ देऊ नका. ते पुढे म्हणाले की, पर्याय म्हणजे एक दीर्घकालीन संघर्ष आणि अणु प्रसाराचा धोका, जो फक्त मध्यपूर्वपुरताच मर्यादित राहणार नाही, तर जागतिक अणु अप्रसार यंत्रणेवरही घातक परिणाम करू शकतो.
