30 C
Mumbai
Sunday, March 16, 2025
घरविशेषकानपूरमध्ये वक्फ कटाचा पर्दाफाश, १६६९ पैकी ५४८ सरकारी मालमत्तेवर कब्जा!

कानपूरमध्ये वक्फ कटाचा पर्दाफाश, १६६९ पैकी ५४८ सरकारी मालमत्तेवर कब्जा!

वक्फ मालमत्तांच्या सर्वेक्षणात खुलासा 

Google News Follow

Related

कानपूर जिल्ह्यात तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या वक्फ मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. चार तहसीलमध्ये एकूण १६६९ मालमत्तांची ओळख पटली आहे. सदर तहसीलमध्ये सुन्नी वक्फ बोर्डाच्या ९१४ मालमत्ता आणि ३४ शिया मालमत्ता आहेत. वक्फ बोर्डाच्या घाटमपूर तहसीलमध्ये १८९ , बिल्हौरमध्ये ३८८ आणि नरवलमध्ये १४४ मालमत्ता आहेत. विशेष म्हणजे, यापैकी सुमारे ५४८ मालमत्ता या सरकारी मालमत्ता आहेत. या सरकारी जागेवर वक्फने कब्जा करत मशिदी आणि कब्रस्तान बांधण्यात आली आहे.

सर्वेक्षणानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली. या मालमत्तांची संपूर्ण माहिती महसूल विभागाकडे नाही. जिल्हा प्रशासनाने सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाला पाठविला आहे. आता संयुक्त संसद समिती अहवालाचा अभ्यास करून पुढील कारवाई करणार आहे.
हे ही वाचा : 

एका आठवड्यापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वक्फ मालमत्तांवर अतिक्रमण करणाऱ्यांकडून जमीन परत घेण्याबाबत बोलले होते. यानंतर शासनाच्या सूचनेवरून प्रशासनाने वक्फ मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू केले. दरम्यान, २०२१ मध्येही शासनाच्या आदेशानुसार मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.

याबाबत वक्फ मालमत्ता नोडल अधिकारी डॉ. राजेश कुमार म्हणाले, वक्फ मालमत्तांचे सर्वेक्षण करून अहवाल शासनाला पाठविला आहे. जिल्ह्यात १६६९ मालमत्ता आहेत. त्यापैकी ५४८ सरकारी मालमत्ता आहेत. सरकारी पथक आपल्या स्तरावर अभ्यास करून कारवाई करेल.
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा