‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी जम्मू-कश्मीरच्या श्रीनगरमधील बादामी बाग कॅम्पमध्ये पोहोचले. येथे त्यांनी लष्कराच्या जवानांशी संवाद साधला आणि त्यांना संबोधित केले. राजनाथ सिंह म्हणाले, “मी आज तुमच्या त्या ऊर्जा आणि शौर्याला अनुभवायला आलो आहे, ज्यांनी शत्रूंना नेस्तनाबूद केले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या सर्व निरपराध नागरिकांना आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान वीरमरण आलेल्या आपल्या जवानांना मी वंदन करतो. जखमी जवानांच्या धैर्यालाही सलाम करतो आणि त्यांना लवकर बरे होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो.
ते पुढे म्हणाले, “आपल्या पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वाखाली ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये तुम्ही ज्या प्रकारे कामगिरी बजावली, त्याने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला आहे. मी सध्या तुमचा संरक्षण मंत्री असलो तरी, मी सर्वप्रथम भारताचा नागरिक आहे आणि नागरिक म्हणून तुमचे आभार मानायला आलो आहे. तुम्ही पाकिस्तानच्या चौक्या आणि बंकर्स नष्ट केले, हे शत्रू कधीही विसरणार नाही. तुम्ही जोशही राखला आणि होशही राखला. मी इथे फक्त संरक्षण मंत्री म्हणून नाही, तर एक संदेशवाहक म्हणून आलो आहे. देशवासियांच्या शुभेच्छा, प्रार्थना आणि कृतज्ञता घेऊन आलो आहे. तुम्हाला देशाचा संदेश देण्यासाठी आलो आहे की ‘आम्हाला आपल्या सेनांवर अभिमान आहे’.
हेही वाचा..
सोने खरेदीदारांना दिलासा किती झाला सोन्याचा दर ?
‘जय हिंद सभा’ : मंत्री सिरसांचा टोला, काय म्हणाले
भारत कोणत्या सेक्टरसाठी जागतिक उत्पादन आणि निर्यात केंद्र बनू शकतो ?
मधुमेह नियंत्रित करण्यासाठी कोणता कार्यक्रम प्रभावी?
राजनाथ सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे कौतुक करताना सांगितले की, “हे केवळ एक ऑपरेशन नव्हते, तर भारताची एक प्रतिज्ञा होती. भारत डिफेन्स फक्त करत नाही, गरज भासल्यास कठोर निर्णय घेण्यासही मागे हटत नाही. हे ऑपरेशन प्रत्येक जवानाच्या डोळ्यातील स्वप्न होते — दहशतवाद्यांच्या प्रत्येक अड्ड्याचा सफाया करणे. ते म्हणाले, “‘ऑपरेशन सिंदूर’ ही आतापर्यंतची भारताची दहशतवादाविरोधातील सर्वात मोठी कारवाई आहे. भारत ३५-४० वर्षांपासून सरहद्द पारच्या दहशतवादाचा सामना करत आहे. आता भारताने जगाला दाखवून दिले आहे की दहशतवादाच्या विरोधात आम्ही कोणत्याही टोकाला जाऊ शकतो. पंतप्रधान मोदींनी भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाची पुनः व्याख्या केली आहे. हिंदुस्तानच्या जमिनीवर झालेला कोणताही दहशतवादी हल्ला ‘युद्धाचा एक भाग’ मानला जाईल.
जर पाकिस्तानने पुन्हा कुठलीही चुकीची कृती केली, तर त्याचे परिणाम फार दूरवर जातील. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे की दहशतवाद आणि चर्चा एकत्र कधीच होऊ शकत नाहीत. जर चर्चा झाली, तर ती फक्त दहशतवाद आणि पीओकेवरच होईल. राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना इशारा देताना म्हटले, “‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशामुळे पाकिस्तानमध्ये लपलेले दहशतवादी आणि त्यांचे आका आता कुठेही सुरक्षित नाहीत. भारतीय सेनेचे लक्ष्य अचूक आहे आणि आता दहशतवाद्यांना मोजणी करावी लागेल. पाकिस्तानच्या अण्वस्त्र धमक्यांकडे आम्ही दुर्लक्ष केले आहे. जगाने पाहिले आहे की पाकिस्तानने किती वेळा भारताला अण्वस्त्र धमक्या दिल्या आहेत. आज श्रीनगरच्या भूमीवरून मी जगापुढे प्रश्न ठेवतो की अशा गैरजबाबदार राष्ट्राच्या हातात अण्वस्त्रे किती सुरक्षित आहेत? मला वाटते पाकिस्तानच्या अण्वस्त्रांना आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी (IAEA)च्या देखरेखीखाली आणले पाहिजे.
