27.4 C
Mumbai
Sunday, July 13, 2025
घरविशेषआसाममध्ये मुस्लिम देशातील ५ हजार मीडिया अकाऊंट्स कार्यरत!

आसाममध्ये मुस्लिम देशातील ५ हजार मीडिया अकाऊंट्स कार्यरत!

मुख्यमंत्री हिमंता सरमा यांचा आरोप

Google News Follow

Related

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी (२० जून) एक मोठा दावा केला की, आसाम काँग्रेसच्या बाजूने ५,००० हून अधिक सोशल मीडिया अकाउंट अचानक सक्रिय झाले आहेत, त्यापैकी बहुतेक इस्लामिक देशांमधून चालवले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्याचे म्हटले आणि केंद्र सरकारला याची माहिती देण्यात आली असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही सोशल मीडिया अकाउंट्स ४७ वेगवेगळ्या देशांमधून आली आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक अकाउंट्स बांगलादेश आणि पाकिस्तानमधील आहेत. गेल्या एका महिन्यापासून ही अकाउंट्स आसाम काँग्रेस आणि एका विशिष्ट काँग्रेस नेत्याच्या कारवायांवर लक्ष केंद्रित करत आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही अकाउंट्स राज्यातील राजकीय वातावरणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शर्मा यांनी केला.

मुख्यमंत्री म्हणाले, “हे अकाउंट राहुल गांधी किंवा अखिल भारतीय काँग्रेस पक्षाशी संबंधित पोस्टना प्रतिसाद देत नाहीत हे खूप आश्चर्यकारक आहे. ते फक्त आसाम काँग्रेस आणि एका विशिष्ट नेत्याच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट करत आहेत.” त्यांनी त्या नेत्याचे नाव घेतले नसले तरी, असे मानले जाते की ते गौरव गोगोई यांच्याकडे बोट दाखवत होते, ज्यांना नुकतेच आसाम प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. गौरव गोगोई यांना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही जबाबदारी देण्यात आली होती.

हे ही वाचा : 

उद्धवजी गरळ ओका, टोमणे मारा… पण जनतेची साथ महायुतीलाच!

मोदींचा काँग्रेस, लालू यादवांच्या घराणेशाहीवर आरोप; परिवार का साथ, परिवार का विकास!

एअर इंडिया अपघातातील २२० डीएनए नमुने जुळले; २०२ मृतदेह कुटुंबीयांना सोपवले

उत्तर प्रदेश पोलिसांनी ८ वर्षांत २३४ अट्टल गुन्हेगारांना धाडले यमसदनी

या सोशल मीडिया अकाउंट्सद्वारे आसाम काँग्रेसच्या बाजूने प्रचार केला जात नाही तर इस्लामिक कट्टरतावादाशी संबंधित मजकूर देखील शेअर केला जात आहे. यामध्ये ‘पॅलेस्टाईन समर्थक’, ‘इराणला पाठिंबा’ आणि बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्याशी संबंधित पोस्ट समाविष्ट आहेत, असे मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले.

“२०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसामच्या राजकारणात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात परदेशी हस्तक्षेप दिसून आला आहे. हा केवळ राजकीय मुद्दा नाही तर राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे.” शर्मा म्हणाले की त्यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती भारत सरकारला दिली आहे आणि योग्य चौकशी आणि कारवाईची मागणी केली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा