29 C
Mumbai
Sunday, March 23, 2025
घरविशेषसोनप्रयागहून केदारनाथ ३६ मिनिटांत गाठता येणार; रोपवे प्रकल्पाला मंजुरी

सोनप्रयागहून केदारनाथ ३६ मिनिटांत गाठता येणार; रोपवे प्रकल्पाला मंजुरी

गोविंदघाट ते हेमकुंड साहिब जी पर्यंतच्या रोपवे प्रकल्पाच्या बांधकामालाही हिरवा कंदील

Google News Follow

Related

केंद्रीय मंत्रिमंडळाने सोनप्रयाग ते केदारनाथ या १२.९ किमी रोपवे प्रकल्पाच्या बांधकामाला मंजुरी देत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासोबतच गोविंदघाट ते हेमकुंड साहिब जी पर्यंतच्या १२.४ किमी रोपवे प्रकल्पाच्या बांधकामालाही मंजुरी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने केदारनाथ रोपवे प्रकल्पाला मंजुरी दिली.

सोनप्रयाग ते केदारनाथ असा हा रोपवे प्रकल्प असणार असून एकूण १२.९ किलोमीटर लांबीच्या या रोपवेसाठी सुमारे ४,०८१ कोटी रुपयांचा आर्थिक खर्च येणार आहे. हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्सफर (डीबीएफओटी) पद्धतीने विकसित केला जाईल. हा रोपवे सार्वजनिक- खाजगी भागीदारीत विकसित करण्याचे नियोजन आहे. तसेच हा प्रकल्प सर्वात प्रगत ट्राय- केबल डिटेचेबल गोंडोला (३ एस) तंत्रज्ञानावर आधारित असेल. याची डिझाइन क्षमता प्रति तास १,८०० प्रवासी प्रति दिशा (पीपीएचपीडी) असेल आणि दररोज १८,००० प्रवासी वाहून नेले जातील.

केदारनाथला भेट देणाऱ्या यात्रेकरूंसाठी हा रोपवे प्रकल्प एक वरदान ठरणार असून पर्यावरणपूरक, आरामदायी आणि जलद कनेक्टिव्हिटी यामुळे मिळणार आहे. विशेष म्हणजे ८ ते ९ तासांच्या या प्रवासाला रोपवेमुळे सुमारे ३६ मिनिटे लागणार आहेत. रोपवे प्रकल्प बांधकाम आणि ऑपरेशन दरम्यान तसेच वर्षभर प्रवास, अन्न आणि पेये आणि पर्यटन यासारख्या संबंधित पर्यटन उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण करणार आहे.

रोपवे प्रकल्पाचा विकास हा संतुलित सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी, डोंगराळ प्रदेशात शेवटच्या मैलापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि जलद आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. केदारनाथ मंदिरापर्यंतचा प्रवास गौरीकुंडपासून १६ किमीचा चढाईचा एक आव्हानात्मक मार्ग आहे आणि सध्या तो पायी किंवा घोडे, पालखी आणि हेलिकॉप्टरने केला जातो. केदारनाथ हे उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यात ३,५८३ मीटर (११९६८ फूट) उंचीवर असलेल्या १२ पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मंदिर अक्षय तृतीया (एप्रिल-मे) ते दिवाळी (ऑक्टोबर-नोव्हेंबर) पर्यंत वर्षातून सुमारे ६ ते ७ महिने भाविकांसाठी खुले असते आणि दरवर्षी सुमारे २० लाख भाविक येथे भेट देतात.

हे ही वाचा:

अबू आझमींना उत्तर प्रदेशात पाठवा, आम्ही त्यांच्यावर उपचार करू!

कोरटकर तर चिल्लर, आव्हाडांवर बोला, नेहरूंचा निषेध करा, आहे हिंमत?

औरंगजेबाला महान राजा म्हणणारे अबू आझमी निलंबित!

५५ लाख परदेशी भाविक महाकुंभात डुंबले

गोविंदघाट ते हेमकुंड साहिब जी पर्यंतच्या १२.४ किमी रोपवे प्रकल्पाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे हा प्रकल्प डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर (DBFOT) पद्धतीने विकसित केला जाईल आणि एकूण २,७३० कोटी रुपये याचा खर्च येईल. हेमकुंड साहिब जी हे उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यात १५,००० फूट उंचीवर वसलेले एक तीर्थस्थळ आहे. या पवित्र स्थळावर स्थापन केलेला गुरुद्वारा मे ते सप्टेंबर दरम्यान वर्षातून सुमारे ५ महिने खुला असतो आणि दरवर्षी सुमारे १.५ ते २ लाख यात्रेकरू येथे भेट देत असतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा